बुधवार, १ मे, २०१९

हिंदू कोण – ६५


मागील भागातून पुढे
१६. मृत्यू नंतरचे जीवन
७९. ह्या संदर्भात आणखीन एक उदाहरण पाहू या. बर्याच वर्षापूर्वीची ही सत्य घटना आहे. एक वृद्ध महिला तिच्या नातवाच्या घरात रहात होती. तिचा तेथे वेळोवेळी अपमान होत होता. ती बिचारी असहायपणे ते सर्व गुपचुप सहन करीत रहात होती. अखेरीस तिचा मृत्यू झाला व तिचे दिवसवार केले गेले. तिला शिधा वाढला गेला. एका केळ्याच्या पानावर ते जेवण वाढले होते. एका अशा जागी ते ठेवले किं, कावळे तेथे येतील. पण आश्र्चर्याची बाब अशी किं, एकही कावळा आला नाही. असे बरेच दिवस ते तेथे होते पण कावळाच काय त्याच्या आजूबाजूनी फिरणारे उंदीर, घुशीसुद्धा त्याला स्पर्श करीत नव्हते. त्यावर धुळ जमू लागली व कालांतराने ते त्या धुळीत झाकले गेले. शेवटी पावसाच्या पाण्याने ते वाहून गेले. हा प्रकार वरकरणी सामान्य वाटला तरी हा तितका साधा प्रकार नाही हे संशोधकांच्या लक्षात आले. स्वाभाविकपणे कोणी जीवजिवाणू ते खावयास पाहिजे होते परंतु, तसें झाले नाही. साधी माशी, झुरळ असें कोणतेही त्याला कां नाही लागले? ह्याचे कारण काय? त्याचे स्पष्टीकरण असें सांगतात किं, भूताला दिलेले जेवण त्याचा हक्क असतो व कोणताही प्राणी तो हक्क टाळत नाही. ह्या उदाहरणातील म्हातारीच्या भूतानी ते जेवण राखून ठेवले व त्याद्वारा आपला तिरस्कार तिने व्यक्त केला.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ८१ -९०
ब्राह्मणाची हत्त्या करणे हे महापातक समजले जाते. म्हणून राजाने ब्राह्मणाची हत्त्या करणार्याचा साधा विचार सुद्धा करू नये. ३८१
जर वैश्याने सुरक्षित क्षत्रिय अथवा वैश्य स्त्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला असुरक्षित ब्राह्मणीशी तसे केल्याची शिक्षा करावी. ३८२ टीपः येथे सुरक्षित म्हणजे लग्न झालेली असा घ्यावयाचा. असुरक्षित म्हणजे कुमारिका, विधवा, परित्यक्ता, भिकारीण किंवा वृद्धा असा घ्यावा.
जर ब्राह्मणांने सुरक्षित क्षत्रिय अथवा वैश्य स्त्रीशी वगट केली तर त्याला एक हजार पन्ना दंड करावा. जर सुरक्षित शुद्र स्त्रीशी क्षत्रिय अथवा वैश्य पुरूषानी प्रयत्न केला तर त्याला एक हजार पन्ना दंड करावा. ३८३
असुरक्षित क्षत्रिय महिलेशी वैश्य पुरूषाने समागम करण्याची शिक्षा आहे, पांचशे पन्ना दंड. क्षत्रिय पुरूषाने केला तर त्याची गाढवाच्या मुतांने हजामत करून पांचशे पन्ना दंड करावा. ३८४
जर ब्राह्मणाने असुरक्षित क्षत्रिय, वैश्य अथवा शुद्र महिलेशी समागम, सलगी केली तर दंड पांचशे पन्ना करावा. चांडाळ स्त्रीशी संभोग केला तर एक हजार पन्ना देड करावा. ३८५
ज्या राजाच्या राज्यात कोणी चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, कोणी कोणाची बदनामी करत नाही, कोणी कोणाची हत्त्या करत नाही, कोणी कोणावर हल्ला करत नाही, मारामार्या होत नाहीत म्हणजे त्याच्या राज्यात तमोगुणी लोक नाहीत असा राजा इंद्रपदी जातो. ३८६
हे पांच गुन्हे (चोरी, व्.भिचार, बदनामी, हत्त्या व हल्ला) नियंत्रित करण्याने तो राजा सर्व सामर्थ्यवान समजला जातो. ३८७
यजमान जो पुरोहिताचा त्याग करतो, जो पुरोहित यजमानाचा त्याग करतो, ज्यामुळें यज्ञ बिघडतात, (हा मोठा गुन्हा समजला आहे) अशा दोघांना प्रत्येकी शंभर पन्ना दंड करावा. ३८८
जातीच्या नांवाला काळिमा लागेल असें कोणतेही कृत्य केलेले नसतांना जर कोणी आपले आप्त जसें, आई, बाप, मुलगा, पत्नी, मुलगी ह्यांना टाकले तर तो गुन्हा ठरतो. त्यासाठी सहाशे पन्ना दंड सांगितला आहे. ३८९
जेव्हां द्विजांमध्ये कोणाचे कर्तव्य काय ह्या मुद्यावर वाद होतो तेव्हां राजा, जो स्वतः भले चिंतीतो, घाईने निर्णय घेणार नाही. ३९०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा