गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

हिंदू कोण – ४६

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
मनुस्मृतीच्या तिसर्या भागात वरील पांच खाटीकखान्यांचा उल्लेख आहे. त्यांना खाटीकखाने असें म्हणण्याचे कारण, त्यात शाक पदार्थ खाण्यासाठी तयार केले जातात. ह्याचा अर्थ मनुस्मृतीच्या काळी शाक पदार्थांत जीव असतो हे माहीत होते असें मानावे लागेल. खाटीकखाने म्हणण्याचे कारण, ह्या साधनांचा वापर करून स्वयंपाक करतांना शाक पदार्थांतील जीव वेदनामय रीत्या मारला जातो. जर विनावेदना हे जीव मारले गेले तर त्यांना खाटीकखाने असें म्हंटले नसते. मांसाहारात प्राणी विनावेदना मारता येतात तसें शाकाहारात करता येत नाही म्हणून, शाकाहार जास्त हिंसक ठरतो. असें असले तरी शाकाहाराचा विशेष प्रचार केला जाते कारण माणसांचे ह्या विषयातील अज्ञान असेंच म्हणावे लागेल.
निसर्गाने माणसास उभय भक्षी केले आहे त्याचा अर्थ माणसांने मांसाहार करणे निसर्ग नियमानुसार उचीत आहे. उलट तसें न खाणे हेंच आक्षेपार्ह असते. निसर्गांने म्हणजेंच परमेश्र्वराने घालून दिलेले पवित्र नियम पाळणे माणसाचे कर्तव्य असते. शक्यतर हत्या विनावेदना करावयाची असली तरी, हिंसा हत्या अशा अयोग्य सबबी पुढे करून मांसाहारास विरोध करणे हे निसर्गाच्या आदेशाची पायमल्ली करण्यासारखे ठरते. जैन विचार अशारितीने निसर्गाच्या आदेशांविरूद्ध असतात म्हणून ते पापकारक ठरतात. जैन म्हणतात मी मारतो, हेंचमुळी गीतेच्या आदेशानुसार चुकीचे आहे. जैन विचार कसा दिशाभूल करणारा आहे ते दुसर्या भागात आपण पहाणार आहोत. म्हणून जैन विचाराची दखल कोणीही हिंदूंनी घेता कामा नये. ह्याला अपवाद असा आहे किं, जर एकाद्याला मांसाहार आवडत नसेल तर तो त्यांने करू नये कारण, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार जे खाद्य आवडत नाही ते खाऊ नये.
६३. हिंदूंना खाण्याबाबत पांच नियम आयुर्वेदात सांगितले आहेत ते असें,
  • जे आवडते ते खावे,
  • जे पचेल ते खावे,
  • पोटापुरते खावे,
  • जे आरोग्यास घातक ते खाऊ नये.
  • दुसर्यास खाण्याचा आग्रह करू नये.

ह्यांत मांसाहार, शाकाहार वगैरे बद्दल कांहींही उल्लेख नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यातील पहिले चार नियम स्वतः पाळावयाचे असतात. पांचवा नियम सामाजिक शिष्टाचाराबाबतचा आहे. त्यांत पहिल्या नियमावर दुसरा व त्यावर तिसरा महत्वाचा असतो आणि त्यावर चौथा महत्वाचा असतो. ते असें, आवडणारा पदार्थ पचत नसेल तर तो खाऊ नये, जर आवडणारा पदार्थ पचतो तरी पोटापेक्षा जास्त खावयाचा नाही. तसेंच जर तो आरोग्यास घातक असेल तर खावयाचा नाही. उदाहरणार्थ, साखर आवडते म्हणून गोड खावेसे वाटले तरी जर मधुमेह असेंल तर गोड खावयाचे नाही. अशा प्रकारे खाण्याबद्दल हिंदूंना आयुर्वेदाच्या नियमानुसार मार्गदर्शन दिले आहे. त्याचे पालन हिंदूंनी करावे.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -२०
जर कांहीं निश्र्चित ठरविणे शक्य नसेल तर ठेव दिल्याची ग्वाही करणारा व ती कधी दिलीच नव्हती असें सांगणारा अशा दोघांना त्या मुल्याच्या एवढी रक्कम दंड करावा. १९१
उघडी ठेव न परत करणारा व बंद ठेव नाकारणारा अशा दोघांना राजा (न्यायाधीश) त्या मुल्या इतका दंड करील. १९२
जो माणूस दुसर्याची गोष्ट खोटे बोलून हडप करतो त्याला व त्याच्या साथीदारांस शारिरीक शिक्षा (फटके मारणे, चटके देणे, काट्यावरून चालावयास लावणे इत्यादी) द्यावी. १९३
अनेक साक्षीदारांच्या साक्षीने एकादी गोष्ट दिली आहे तर त्याचे वर्णन सर्व साक्षीदार एकच करतील, त्याबद्दल जर कोणी खोटे सांगितले तर त्याला दंड होईल. १९४
परंतु, जर एकादी गोष्ट खाजगीत दिली असेल तर ती परत करतांनासुद्धा खाजगीतच केली पाहिजे. १९५
अशारितीने, राजा विशेष दक्षता न बाळगता अशा मैत्रीपूर्ण ठेवींच्या बाबतचे निर्णय घेईल. १९६
दुसर्याची मालमत्ता मालकाच्या परवानगी शिवाय विकणार्या इसमास, न्यायाधीश चोर ठरविल व जरी तो स्वतःला निर्दोष मानत असला तरी, त्याला इतर खटल्यात साक्षीदार म्हणून मान्यता देणार नाही. १९७
असा चोर जर मालकाच्या जवळचा नातेवाईक असेल तर त्याला राजा दंड करील परंतु, जर तो मालकाशी संबंधित नसेल तर त्याला चोर ठरवून त्याप्रकारची शिक्षा करेल. १९८
न्यायाच्या रिवाजानुसार जर एकाद्याने मालकाच्या परवानगी शिवाय त्याची चीजवस्तु दुसर्यास भेट केली अथवा विकली तर तो व्यवहार अवैध ठरून त्याप्रमाणे त्यावरील कारवाई होईल. १९९
जेथे कब्जा सिद्ध होतो परंतु, मालकी हक्क सिद्ध होत नाही, आणि जेथे मालकी हक्क सिद्ध होतो पण कब्जा नाही तर अशा परिस्थितीत मालकी हक्क जास्त महत्वाचा ठरेल, हा ठरलेला नियम आहे. २००
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

सोमवार, १ जानेवारी, २०१८

हिंदू कोण – ४३

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
ह्या ब्रह्माच्या निर्मात्याने, प्रजापतीने हे सर्व जे उत्पन्न केले आहे ते ब्रह्मतत्त्वाच्या उपजिविकेसाठी, असें मनु सांगतो. म्हणजे सर्व चर व अचर गोष्टी ह्या ब्रह्मतत्त्वाच्या उपजिविकेसाठीच असतात. २८ : , टीपः संत पीटरच्या साक्षात्कारात हेंच सांगितले आहे.
अचर गोष्टी (वनस्पती) चरांच्या उदरनिर्वाहासाठी असतात. दांत नसलेले दांत असलेल्यांचे भक्ष असतात. ज्यांना हात नाहीत ते हात असलेल्यांचे भक्ष असतात. जे भित्रे असतात ते धीटांचे भक्ष असतात. २९ : ५ टीपः पहिल्या कारणांनी शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी खाणार व दुसर्या कारणांनी मनुष्य (हात असलेला) सर्व प्राण्यांना खाऊ शकतो.
खाणारा रोज त्याच्या भक्षास खातो त्यामुळे त्यांस पाप लागत नाही. कारण, विश्र्व निर्मात्यानी खाणारा व खाल्ले जाणारे असें दोनही त्या प्रकारेच उत्पन्न केले आहेत. थोडक्यात असे म्हणता येईल किं, जीव जीवांवर जगतो. ही निसर्गाची रचना आहे तेव्हां त्यांत दोष काढण्याचा प्रयास करणे उचीत नसते. उलट ह्या व्यवस्थेला विरोध करणे म्हणजे निसर्गाला विरोध करण्यासारखे, म्हणून पाप ठरते. ३० :
यज्ञात मांसाहार करणे उचीत आहे. हे देवांनी दिलेल्या नियमांनुसार आहे. त्याशिवाय (खाण्याव्यतिरिक्त) उगाचच प्राणी मारणे हे राक्षसी कृत्य व म्हणून पाप ठरते. ते निक्षून टाळावे. ३१ :
जेव्हां पितरांच्या, देवांच्या नांवाने ब्राह्मण मांस खातो तेव्हां ते पाप ठरत नाही. मग ते मांस त्यांने विकत आणले कां कोणी त्याला भेट दिले हे सर्व महत्वाचे नसते. ३२ :
द्विज जो हे पवित्र नियम जाणतो त्यानी कधीही ह्या नियमांविरुद्ध जाऊ नये. जर त्यांने असें केले तर, त्याच्या मृत्यू नंतर त्याचे शत्रू त्याला खातील. ३३ :
फायद्यासाठी हरीण मारणारा व नियमबाह्य मांस खाणारा (चोरलेले) हे दोघेही सारखेच ठरतात. ३४ :
त्याच प्रमाणे जो द्विज श्राद्धाच्या जेवणांत वाढलेले मांस खाण्यास विरोध करतो तो त्याच्या मृत्यूनंतर एकवीस वेळा बळीचा प्राणी म्हणून जन्म घेतो. ३५ :
द्विजांनी मंत्राने पुनीत केलेले मांस खावे. तसेंच सनातन रिवाजानुसार तो वेदमंत्रानी पुनीत केलेले मांस खाऊ शकतो. ३६ : ५ टीपः मंत्रानी पुनीत करणे म्हणजे, ते मांस प्रथम परमेश्र्वराला अर्पण करावयाचा मंत्र बोलावयाचा असतो. हिंदूंनी सर्वच खाद्य पदार्थ खाण्या आधी ते मनानें परमेश्र्वराला प्रथम अर्पून मग खावे असा संकेत आहे.
स्वयंभूने स्वतः हे सर्व प्राणी यज्ञासाठी निर्माण केले आहेत. यज्ञ विधी सर्व जगाच्या भल्यासाठी असतात म्हणून यज्ञात बळी देणे व एरव्ही मारणे ह्यात फरक असतो. ३९ : ५ टीपः देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जात.
वनस्पती, गुरं, पक्षी व इतर प्राणी यज्ञात बळी दिले जातात त्यामुळे त्यांचा उद्धार होत असतो. ४० :
पितरांच्या सन्मानार्थ व श्राद्धात मध-लोणी यज्ञात देतात तेव्हां जनावरांचा बळी देणे हे शिष्टसंमत आहे. असें मनु जाहीर करतो. ४१ :
वेदांतील आदेशांनुसार बळी देणारा व त्यांने मारलेला प्राणी असें दोघेही स्वर्गात जातात. ४२ :
घरात जणूकाय पांच खाटीकखाने आहेत असें म्हणावेसे वाटते. कारण, त्यात शेगडी, पाटावरवंटा, झाडू, खलबत्ता व पाण्याचे पातेले येतात, ह्यांत शाक पदार्थांना शिजवण्यासाठी तयार केले जाते. मनुस्मृती ६८-
ह्या पांच पापकरक वस्तूंमुळे जे पाप दररोज होते त्याचे निवारण करण्यासाठी पांच विधी सांगितल्या आहेत. त्या विघि त्या गृहस्थाने करावयाच्या असतात. मनुस्मृती ६९-
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -
ठेवी देणार्यास त्याची ठेव त्याने मांगितल्यावर ठेव घेणार्याने दिली पाहिजे, नाही दिली तर न्यायालयात ठेव घेणार्यावर देणार्याच्या गैरहजेरीत खटला चालवता येईल. १८१
साक्षीदाराच्या जबान्या जर न्यायाधीशाचे समाधान झाले तर ठेव घेणार्याचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी न्यायाधीश त्याच्याकडे सोने ठेव म्हणून अशारितीने (गुप्तचराच्या मदतीने) ठेवेल असें कीं, ठेवीदाराला संशय येणार नाही. कालांतराने जर त्याने ते सोने योग्य प्रकारे परत केले तर त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध होईल. १८२
अशारितीने त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध झाल्यावर त्यावरील खटला काढून टाकला जाईल. १८३
परंतु जर ते सोने त्या गुप्तचरास त्यांने परत केले नाही व बहाणेबाजी केली तर त्याच्या वरील आरोप सिद्ध होईल व त्याला सर्व ठेव व हे सोने दंडा सकट परत करावे लागते. हा ठरलेला नियम आहे. १८४
बंद लखोट्यात असलेली ठेव ठेवीदाराच्या नातेवाईकांस परतफेड म्हणून देऊ नये. कारण, जर तो नातेवाईक मेला तर ती ठेव बुडाली असें समजले जाते, पण जर तो जीवंत असेल तर मात्र ती त्याच्या कडून मिळवता येईल. १८५
जर ठेवी घेणारा स्वतःच ती ठेव, ठेवीगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या एका नातेवाईकांस देईल तर त्याला त्याबद्दल राजा ठेवीदाराच्या इतर नातेवाईकांचे गार्हाणे ऐकून त्रास देणार नाही. १८६
जर राजाला त्या व्यवहारात कांहीं काळेबेरे आहे असा संशय (ठेव घेणार्याच्या वागणूकीतून) आला तर तो राजा गोड बोलून सामंजस्याने ती ठेव त्या नातेवाईका कढून काडून घेईल. १८७
हे झाले उघड झालेल्या ठेवी बद्दल, जर त्यांने तो बंद लखोटा उघडून त्यातील कांही काढले असेल तरच बंद लखोट्यात असलेल्या ठेवी बाबत ठेव घेणार्यास दोष लागेल. १८८
ठेव चोरीला गेली असेल, पाण्यात वाहून गेली असेल, आगीत भस्मसात झाली असेल, तर ठेव घेणारी निर्दोष समजला जाईल, व त्याला त्याची भरपाई करण्याची गरज नाही. पण जर त्यांने ती ठेव वापरली असेल (असें होण्या आधी) तर मात्र त्याला भरपाई करावी लागेल. १८९
ठेव घेणार्याने माझी ठेव खाल्ली असा आरोप ठेवीदारावर केला व त्याने कधी ठेव ठेवलीच नव्हती असें ठेव घेणार्याने सांगितले तर खरेखोटे ठरविण्यासाठी वेदात दिलेली शपथ त्यांना घेण्यास सांगून त्या प्रमाणे निर्णय घ्यावा. १९०

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.