मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान – ५
मनुस्मृतीत काय दिले आहे ते पहावे लागेल.
मनुस्मृतीच्या पांचव्या अध्यायात २८-३१ श्र्लोकांत काय सांगितले आहे ते पाहू या.
ह्या ब्रह्माच्या निर्मात्याने, प्रजापतिने हे सर्व जे उत्पन्न केले आहे ते ब्रह्मतत्वाच्या उपजिविकेसाठी आहे असे मानले आहे. म्हणजे ह्या सर्व चर व अचर गोष्टीसुद्धा ब्रह्माच्या उपजिविकेसाठीच आहेत. २८
अचर (वनस्पती) गोष्टी चरांच्या उदरनिर्वाहासाठी असतात (म्हणजे शाकाहार), दात नसलेले दात असलेल्यांसाठी खाद्य असतात (म्हणजे पक्षी खाणे), ज्यांना हात नाहीत ते हात असलेल्यांचे खाद्य असतात (म्हणजे पशु व मासळी खाणे), जे भित्रे असतात ते धीटांचे खाद्य असतात. २९
खाणारा दररोज त्याच्या भक्षास खातो तसे केल्याने त्याला पाप लागत नाही. कारण विश्र्वनिर्मात्याने खाणारा व खाल्ले जाणारा असे दोनही त्या प्रकारेच निर्माण केले आहेत. थोडक्यात असे बोलता येते किं, जीव जीवावर जगतो. ही निसर्गाची व्यवस्था आहे त्याप्रमाणे जगण्यात कोणताही दोष नाही. ३०
यज्ञात ब्राह्मणाने मांसाहार करणे उचीत आहे, कारण ते देवांनी केलेल्या नियमांनुसार असते. त्याशिवाय उगाचच प्राणी मारणे मात्र पापकारक, राक्षसी कृत्य समजून टाळावे. म्हणजे खाण्यासाठी नसेल तर कोणत्याही प्राण्यास मारु नये. ३१
मनुस्मृतीच्या ह्या भागात शाकाहार व मांसाहार अशा दोघांचा विचार केला आहे. ते दोनही कसे ग्राह्य आहेत ते दिसते.
ह्याचा अर्थ जैनांची निर्थकपणे नक्कल करणे हिंदू मान्यतेनुसार चुकीचे ठरते. ब्राह्मणांनी कोणता आहार करावा ह्या बद्दल मनुस्मृतीच्या तिसर्या अध्यायात श्र्लोक २६६ ते २७४ मध्ये काय दिले आहे ते पहावे लागेल.
आता मी (भृगु) सांगतो, पितरांना दिलेल्या कोणत्या प्रसादामुळे कोणती चिरकाल टिकणारी फळे मिळतील. २६६
यजमानाचे पूर्वज तीळ, तांदूळ, जवस, वटाणे, पाणी, कंदमुळे, फळे, ह्यांचा रीतसर केलेल्या प्रसादाने एक महिना संतुष्ट रहातील. २६७ म्हणजे शाकाहारामुळे एक महिना
मासळीच्या प्रसादांने दोन महिने, काळवीटाच्या मांसांने तीन महिने, शेळी व मेंढी ह्यांच्या मांसाने चार महिने, आणि पक्षाच्या मांसाने पांच महिने ते संतुष्ट रहातील. २६८
डुकराच्या मांसांने सहा महिने, ठिबके असलेल्या हरणाच्या मांसांने सात महिने, काळ्या काळवीटाच्या मांसांने आठ महिने, ऋरू जातीच्या माशाच्या मांसांने नऊ महिने २६९
रानडुकराच्या व रेड्याच्या (म्हैस) मांसांने दहा महिने व सशाच्या, कासवाच्या मांसांने अकरा महिने पितर संतुष्ट रहातात. २७०
बारा महिन्यासाठी गाईचे मांस किंवा लांब कान असलेल्या बोकडाचे मांस प्रसाद म्हणून ब्राह्मणाला द्यावयाचे असते. २७१
कालसक नांवाची भाजी व महासल्क नांवाचा मांसा, लाल रंगाचा बोकड, वनात जे खाण्यायोग्य खाद्य असेल जे वनवासी खातात ह्यांच्यामुळे चिरकाल समाधान पितरांना व देवांना मिळते २७२
पावसाळ्यातील माघ नक्षत्रामधील शुक्लपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी जे काही मधाबरोबर खाण्यास पितरांना वाढाल त्याने कायम समाधान प्राप्त होईल. २७३
त्याच्या कुळात असा पुरुष जन्मो जो आम्हाला गाईचे मांस शिजवून भाद्रपद महिन्याच्या त्रयोदशीच्या दिवशी दुपारी जेव्हा हत्तीची सावली पूर्वदिशेला पडते तेव्हा वाढेल, असे नेहमी पितर अपेक्षा करतात. २७४
हा लेख पुढील पाेस्ट मध्ये चालू राहील.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक १९१ – २१० वाचू या.
शिक्षकाच्या आदेशांने व एरव्हीसुद्धा विद्यार्थी बटू सतत वेदाच्या अभ्यासात रमेल. त्याशिवाय आपल्या शिक्षकाची सेवा करील. १९१
स्वत:चे संपूर्ण नियमन करून (भाेग इंद्रिये, वाचा अाणि मन) ताे दाेनही हात जाेडून शिक्षकापुढे त्याच्या कडे पहात उभा राहील. १९२
सर्व शरीर झाकलेले असावें पण उजवा हात मात्र उघडा असावा. याेग्य वर्तणूक असावी. जेव्हा शिक्षक त्याला "बस" असा आदेश देईल तेव्हांच ताे शिक्षकाकडे ताेंड करून स्वताच्या आसनावर बसेल. १९३
शिक्षकाच्या घरात रहाणार्या विद्यार्थ्याने शिक्षकांपेक्षा कमी माेलाचे वस्त्र, दागिने नेसावेत. खातांना कमी खावे (आधाशीपणे खाऊ नये) लवकर उठावे व उशीरा झाेपावे. १९४
शिक्षकाशी बाेलतांना ताे (विद्यार्थी) बसलेला, आडवा पडलेला, खाता खाता, तसेंच दुसरीकडे ताेंड करून उभा नसावा, त्याचे हात जाेडलेले (नमस्कार मुद्रेत) असावेत. १९५
शिक्षक उभे असतील तर विद्यार्थ्यानेसुद्धा उभे रहावे. ताे (शिक्षक) चालत असेल तर चालत रहावे, बसलेला असेल तर त्याच्या परवानगीने बसावे, ताे बाेलत असतांना एेकावे, असे वागावे. १९६
शिक्षक बसले किंवा झाेपलेले असतील तर त्यांच्या कडे उभे राहून व वाकून बाेलावे, ताे लांब अंतरावर असेल तर त्याच्या कडे जाऊन (त्याला बाेलवू नये) बाेलावे. शिक्षक खालच्या पातळीवर असेल तर त्याच्याकडे जावे अथवा वाकून बाेलावे. १९७ टिप: शिक्षकांबद्दलचा आदर अशा रितीने व्यक्त करावा.
विद्यार्थी पहुडलेला असेल व शिक्षक जवळ आले तर त्याने नीटपणे पहुडावे, वेडेवाकडे लाेळू नये. १९८
विद्यार्थ्याने शिक्षकाची नक्कल करू नये. त्याच्या पाठी त्याला वाकुल्या दाखवू नयेत, शिक्षकाचे नांव घेतांना अादरयुक्त संज्ञा आधी जाेडून बाेलावे. १९९ टिप: विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल आदर असावा म्हणजे शिक्षक अधिक चांगले शिकवतील अशी अपेक्षा असते.
जेव्हां याेग्य अथवा अयाेग्य रित्या शिक्षकांची निर्भत्सना हाेते तेव्हां विद्यार्थ्याने आपले कान झाकून घ्यावेत, किंवा तेथून निघून जावे. शिक्षकाच्या समर्थनार्थसुद्धा कांहीं बाेलू नये, गपचुप रहावे. २००
शिक्षकांची टीका करणे, त्यांची चेष्टा करणे, असे केल्यांने ताे विद्यार्थी पुढील जन्मी गाढव हाेताे. जाे विद्यार्थी त्या शिक्षकाच्या पैशावर जगेल ताे किटक बनेल. जर विद्यार्थी विनाकारण शिक्षकाचे नांव बदनाम करील तर ताे कुत्रा हाेईल. जाे शिक्षकाचा द्वेष करील ताे माेठा किडा हाेईल. २०१
दुसर्याने सांगितले म्हणून शिक्षकाची सेवा करू नये, स्वेच्छेने ती करावी. सेवा रागावून करू नये. उंच जागी बसला असेल तर खाली उतरून शिक्षकाना अभिवादन करून आपला आदर व्यक्त करावा. बसल्या जागीच नमस्कार करू नये. २०२
शिक्षकाच्या आसनाजवळ बसू नये. वार्याच्या दिशेत बसू नये. असे बाेलू नये जे शिक्षक ऐकू शकणार नाही. २०३
बैल, घाेडा किंवा उंट खेचताे अशा वाहनात विद्यार्थी बसू शकेल. गवताच्या कुरणात, दगडावर, लाकडाच्या बैठकीत व नावेत बसण्यास हरकत नसते. २०४
जर विद्यार्थ्याच्या शिक्षकाचे शिक्षक भेटले तर त्यांना शिक्षकांना जसा मान देतांत तसा द्यावा. परंतु, त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या घरातील आदरणीय माणसांस अभिवादन करू नये. २०५
जे जे त्या विद्यार्थ्यास याेग्य मार्गदर्शन करतांत मग ते शिक्षणाचे असाे, वर्तणूकीचे असावे अथवा पापमुक्त रहाण्याचे असाे, त्या सर्वांचा त्या विद्यार्थ्याने आदर केला पाहिजे. २०६
बटु त्यांच्या सर्व वरिष्ठांशी तसांच वागेल जसा ताे त्याच्या शिक्षकांशी व त्या शिक्षकाच्या नातेवाईकांशी वागेल, जे त्याच्याच वर्णाचे आहेत. २०७
शिक्षकाचा मुलगा वयाने माेठा अथवा लहान असला तरी ताे वडीलांच्या ऐवजी शिकवत असेल व सर्व शास्त्रे, अंगे, शिकवत असेल तर त्याला शिक्षकच समजून त्या प्रमाणे सन्मानपूर्वक वागवावे. २०८
विद्यार्थ्याने जरी शिक्षकाच्या मुलांला सन्मानपूर्वक वागवले तरी त्याची सेवा म्हणून त्याचे पाय चेपणे, त्याला आंघाेळ घालणे, त्याचे उष्टे खाणे असे कांहीही करू नये. २०९
शिक्षकाची पत्नी जर त्याच्याच वर्णाची असेल तर तीला शिक्षकाप्रमाणेंच सन्मान द्यावा. परंतु, जर ती इतर (हलक्या) वर्णाची असेल तर फक्त उठून सन्मान देण्या व्यतिरिक्त काहीही करू नये.

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान – ४
मागील पाेस्ट वरून चालू -
मनुष्य मेलेला प्राणी खात नाही. कारण तो कोणत्या कारणांने मेला ते समजणे आवश्यक असते, जर तो प्राणी विषबाधेने अथवा रोगराईने मेला असेल तर तो खाण्याने माणसाला त्याची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून प्राण्याला खाण्यासाठी त्या प्राण्याची नीटपणे तपासणी करुन तो सद्धृढ आहे कीं नाही ते तपासून नंतरच मारणे श्रेयस्कर असते. जर माणसाने नाही मारला म्हणून तो कायम जगत राहील अशी अपेक्षा करणे केवळ मूर्खपणाचे ठरते. खाण्या व्यतिरीक्त इतर कारणासाठी मारणे मात्र वर्ज आहे. तशी हत्त्या केली तर ती हिंसा ठरते. खाण्यासाठी जे प्राणी सांगितले आहेत ते सर्व झपाट्याने वाढणारे असतात. त्यांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी त्यांना मारणे आवश्यक असते. तसे नाही केले तर त्यांची संख्या भरमसाटपणे वाढून अनर्थ ओढवू शकतो. ह्या संदर्भात इतर धर्मांत काय अाहे ते पहावयास पाहिजे. पीटरची गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. ख्रिस्ती माणसांने काय खावे त्या बद्दल येशूचा संदेश काय होता ते पाहूया.
Act 11:4-10, मध्ये दिल्याप्रमाणे पीटर सांगतो,
पीटर येशुच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सर्वदूर फिरतांना त्याने बधितले किं, लोक प्राणी मारुन खातात. त्याला ते अयोग्य वाटले म्हणून त्याने आपल्या शिष्यांना अनुयायाना सांगितले कीं, सर्वांनी मांसाहार सोडून द्यावा. त्याप्रमाणे काही लोकांनी शाकाहार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो जोप्पा गावात असतांना दुपारी ध्यान करतांना त्याला दृष्टांत झाला. त्यात आकाशातून एक मोठी चादर जमिनीवर उतरतांना दिसली. त्या चादरीवर सर्व लहान मोठे प्राणी वावरत होते. त्याला त्या दृष्याचा अर्थ समजला नाही म्हणून तो देवाला प्रश्र्न विचारतो. तेव्हा आकाशातून आवाज आला, "माणसांनी हे सर्व प्राणी खावयाचे असा ईश्र्वरी संकेत", आहे. त्यावर पीटर उद्गारला, "मला ते अयोग्य वाटले म्हणून मी त्याला विरोध केला आहे". त्यावर आकाशातून आवाज आला,
"ईश्र्वरांनी उत्पन्न केलेले काहीही अयोग्य नसते, तसे समजणे पापकारक आहे. हे मानवा, ईश्र्वराने जसे हे प्राणी निर्माण केले तसेच त्यांना खाणारे सुद्धा उत्पन्न केले त्यातील एक आहे मनुष्य. मनुष्य सर्वात मोठा भक्षक (predator) म्हणून ईश्र्वराने उत्पन्न केला आहे हे विसरू नकोस. निसर्गाच्या निर्विध्न चालू रहाण्यासाठी "जीवोजीवस्य जीवनम्" ह्या नियमाचे पालन होणे आवश्यक आहे म्हणून माणसांने फक्त खाण्यासाठी ह्या प्राण्यांना मारणे योग्य असते. मारतांना त्यांना वेदना होणार नाहीत तेवढे पहा म्हणजे पुण्याचा मार्ग मोकळा होईल. जर माणूस ह्यांना खाणार नाही तर त्यांची संख्या भरमसाट वाढेल अनर्थ ओढवेल". ह्याचा अर्थ जर खाण्यासाठी मारले परंतु, त्यांना वेदना झाल्या तर ते मारणे पापकारक ठरते.
ह्याचा अर्थ, येशुच्या तत्वज्ञाना नुसार मांसाहार करणे त्यासाठी वेदनाविरहीत असे त्यांना मारणे हे सर्व परमेश्र्वराची सेवा करण्यासारखेच आहे.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक १६७ – १९० वाचू या.
खराेखरच द्विज, जाे वेदांत दिलेले कठाेर व्रत प्रामाणिकपणे पाळताे, वेदाचे पठण नित्य नेमाने करताे. १६७
जाे द्विज वेदांचा अभ्यास करीत नाही व उपजिविकेसाठी इतर काम करताे ताे शुद्र ठरताे. त्याचे वंशजसुद्धा शुद्र ठरतात. १६८ टीप: गीतेतील अध्याय तीन पहा, गुणकर्म विभागश:, प्रमाणे
पवित्र नियमांनुसार द्विज तीन वेळा जन्म घेताे. पहिला मातेच्या पाेटी, दुसरा उपनयन विधीने व तिसरा जन्म जेव्हां ताे श्राैत विधी शिकताे. १६९
ह्या तीन जन्मातील उपनयनाचा जन्म त्याला वेद शिकण्याचा अधिकार देताे. त्यानंतर सावित्री मंत्र त्याची माता समजावी व त्याचा शिक्षक पिता ठरताे. १७०
उपनयनाच्या विधीमुळे त्याला शिकण्याची परवानगी मिळते. म्हणून ते शिकविणारा शिक्षक त्याचा पिता ठरताे. १७१
ज्याचा उपनयन विधी झाला नाही त्याने वेदाचे वाचन करावयाचे नसते. त्यानी फक्त अंत्यविधी करावयाचे असतात कारण, उपनयन विधी हाेण्या आधी ताे शुद्रासमान असताे. १७२
उपनयन झाल्यावर बटूला सर्व संबंधित विधी व इतर साेपस्कार शिकावे लागतात. त्यातूनच ताे वेद शिकत जाईल. १७३
वेद शिकण्यास सुरुवात करण्या आधी शपथ घेण्याचा विधी हाेताे त्यासाठी बटू आपला पाेषाख, दंड, जान्हवे, कमरपट्टा, इत्यादि जे विद्यार्थ्यासाठी सांगितले आहेत ते त्यानी नेसावेत. १७४
जाे विद्यार्थी शिक्षकाच्या घरी रहाताे त्यांने त्याच्या भाेगइंद्रियांचे चांगले संयमन करून रहावयाचे असते. अशांने त्याची आध्यात्मिक प्रगति चांगली हाेईल. १७५
बटूने सकाळी स्नान करून स्वत:ला शुद्ध करावे, त्यानंतर पाण्याने अर्ध्य देऊन देव, ऋषी, पितर, ह्यांचे पुजन करावे. त्यासाठी त्यांच्या चित्र अथवा मूर्ति ह्यांचा उपयाेग करावा व पवित्र अग्नीत हवन घालावे. १७६. टीप: मनुस्मृतीला मूर्तिपुजा मान्य असल्याचा हा पुरावा.
बटू शिक्षण करीत असतांना त्यांने मध, मांस, अत्तर, हार, खाद्यपदार्थ सुगंधी करणारी द्रव्ये, आंबट पदार्थ, ह्यांचा त्याग करावा. तसेंच गरीब जीवांना त्रास देऊ नये. १७७
स्वत:च्या अंगाला अत्तर लावू नये, डाेळ्यात सुरमा, काजळ घालू नये, पायात जाेडे घालू नये आणि छत्री वापरू नये. म्हणजे, भाेग इंद्रिये उत्तेजित करणार्या सर्व गाेष्टींचा त्याग करावा. त्यांत नांच, गाणे व वाद्ये वाजवणे असे कांहीही करू नये. १७८
जुगार खेळणे, वितंडवाद घालणे, टाेमणे मारणे, खाेटे बाेलणे, स्त्रीस स्पर्श करणे, इतरांना त्रास हाेईल असे बाेलणे, हे व अशा विघातक गाेष्टी करणे वर्ज आहे. १७९
एकटे झाेपावे, स्त्रीसंग करू नये, जाे हस्तमैथून करील तर त्याचे पवित्र बंधन नष्ट हाेईल म्हणून असे काहीही करू नये. १८०
द्विज बटू जर स्वप्नावस्था झाली तर आंघाेळ करील, त्यानंतर सूर्याची प्रार्थना करील, त्यानंतर ऋग्वेदातील ऋचा तिनदा जपेल आणि अशी विनंति करील कीं, "गेलेले पाैरुष्य मला पुन्हा प्राप्त व्हावे". १८१
बटू आश्रमासाठी पाणी भरेल, फुले गाेळा करेल, शेण गाेळा करेल, माती व कुश गवत आणेल आणि भीक मागेल. १८२
हे विद्यार्थी अशा गृहस्थांकडून दरराेज भिक्षा आणतील जे वेद जाणतात व त्याचे पालन करतात आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. १८३
शक्य हाेईल तर त्यानी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून भीक मागू नये. परंतु, जर काेणी इतर नसेल ज्याच्या कडून भीक मागावी तर मग, जवळच्या नातेवाईकांकडून भीक मागावयास हरकत नसावी. १८४
असे काेणीही भीक मागण्यासाठी नसेल तर मात्र काेणाही निष्पाप गृहस्था कडून भीक मागण्यास हरकत नाही. १८५
पवित्र अग्नी आणल्यावर ताे जमिनीवर ठेवू नये. त्यात दरराेज शांत व गंभीरपणे सकाळी व संध्याकाळी हवन करावे. १८६
जाे बटू आजारी नसूनही दरराेज असे सात दिवस भीक मांगण्यासाठी जात नाही त्याला प्रायश्र्चित्त करावे लागेल, अशा प्रायश्र्चित्तास अवकिर्निन (घेतलेली शपथ माेडण्या बद्दलचे) असे म्हणतात. १८७
शपथ घेतलेल्या बटूने फक्त भिकेच्या अन्नावर उपजिविका करावयाची असते. दुसर्याचे अन्न खावू नये. अशारितीने भीक मागून अन्न खाणे उपवास करण्या सारखेच समजावे. १८८
बटूला याेग्य वाटेल तर दुसर्याने दिलेले अन्न जर ताे अंत्यष्टीस आमंत्रणाने गेला असेल तर खाण्यास हरकत नाही. तसेंच देव, पितर ह्यांना वाहिलेले अन्न वैराग्या (जाेगी) सारखे खाण्यास हरकत नसते. १८९
हे फक्त ब्राह्मण बटूस लागू आहे, इतर बटूंस (क्षत्रिय, वैश्य), ह्यानी मात्र असे करू नये. १९०

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.