सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

हिंदू कोण – ३८

इंनटरनेटच्या अडचणीमुळे पाेस्ट करू शकलाे नाही त्याबद्दल क्षमस्व

मागील भागातून पुढे
. सत्य, असत्य व हित, अहित ह्याचा पाप-पुण्य संबंधातील विचार –

५६. सत्य काय व असत्य काय ह्यावर हिंदूंच्या परंपरेत कोणती माहिती आहे ते पहावयाचे आहे. सत्य म्हणजे काय? एकदा हिंदू तत्त्वज्ञानात हे जग माया म्हणजे भ्रम आहे असें सांगितले जाते व माया म्हणजेच भ्रम म्हणजे खोटे अथवा असत्य आहे असें समजत असतांना दुसर्या वेळी त्यात सत्य पहाण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य होईल असा प्रश्र्न उभा रहातो. ह्याचा अर्थ जे सत्य ह्या जगात असते ते असत्यातील सत्य अथवा सापेक्ष सत्य असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्याला आपण सत्य समजतो ते फक्त कोणत्या तरी एका दृष्टीने सत्य असू शकते व इतर दृष्टीने तेंच असत्य असू शकते. ते कधीही पूर्ण सत्य नसते हे लक्षात घेतले पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचा हा गाभा आहे. असे असले तरी सर्वच धर्मांत, सत्य बोला असें सांगतात. हिंदूंतील अनेक ग्रंथांतसुद्धा सत्याचा आग्रह धरा असे सुचवलेले असते. असें असले तरी आपण आपल्या आयुष्यात बहुतेक प्रसंगी खरे बोलण्यापेक्षा खोटेच बोलणे जास्त पसंद करतो असा सर्वांचा अनुभव आहे. अशारितीने खोटे बोलण्यामुळे पाप लागते कां? हे बघावे लागेल. असा अनुभव आहे किं माणूस कोणाच्या तरी हितासाठी खोटे बोलत असतो. येथे हिताचा विचार महत्वाचा असतो. आता प्रश्र्न उत्पन्न होतो किं, कोणाचे हित?
आदिशंकराचार्यांनी त्यांच्या टीकांत "ब्रह्म सत् जगन् मिथ्या", असें लिहीले आहे. येथे ब्रह्म म्हणजे परमेश्र्वर असा अर्थ घ्यावयाचा आहे. त्याप्रमाणे, परमेश्र्वर हेंच केवळ सत्य आहे व हे जग म्हणजे निसर्ग खोटा आहे. असे त्यांनी सांगितले आहे. परंतु, आपल्या दैनंदिन व्यवहारात मात्र सत्य वेगळे असते. ते सत्य व शंकराचार्यांचे सत्य ह्यांत कांहींच संबंध नाही. त्यामुळे वरील विधान प्रथम दर्शनी अग्राह्य ठरते. येथे मुद्दा असतो काय केल्याने पाप लागणार नाही. कारण, पापमुक्त जीवन हा माणसाच्या जीवनातील महत्वाचा मुद्दा असतो. जर व्यवहारात आपण सत्य सांगितले व त्यामुळे जर पाप होणार असेल तर ते सत्य पापकारक असल्यानें अग्राह्य ठरते. म्हणजे येथे सत्य कीं असत्य हे कमी महत्वाचे असते, पापकारक कीं, पुण्यकारक, हे महत्वाचे असते. येथे हित व अहित हे सत्य व असत्याशी संबंधित आहेत व ते कसे ते पहावे लागेल. त्यासाठी एक रुपक कथा उपनिषदात दिले आहे ती पाहूया.
५७. एक सज्जन एका चार रस्त्यांच्या नाक्यावर उभा आहे व अशा परिस्थितीत तो, एक स्त्री समोरून धांवत येतांना पहातो. ती स्त्री लगबगीने उजव्या फाट्याने पुढे निघून जाते. त्यानंतर थोड्याच अवधींनी दोन धटींगण पुरुष समोरून येतांना तो पहातो. तो समजतो किं, हे दोघे त्या स्त्रीचा पाठलाग करीत आहेत. नाक्यावर आल्यावर ते आजुबाजूस पहातात परंतु, त्यांना ती बाई कोठेही दिसत नाही. त्यानंतर ते ह्या सज्जनास विचारतात, ती बाई कोठे गेली?
आता सज्जनांस प्रश्र्न पडतो, सत्य बोलावे कीं, असत्य? जर सत्य सांगितले तर ती स्त्री मोठ्या अडचणीत पडणार व त्याचे पातक ह्या सज्जनांस लागणार व जर असत्य सांगितले तर असत्य बोलण्याचे दुषण लागणार. येथे आड व तेथे विहीर अशी परिस्थिती झाली आहे, अशा प्रसंगी काय सांगणे जास्त श्रेयस्कर हे पहावयाचे आहे. ह्या ठिकाणी त्या सज्जनांने ती स्त्री डावी कडे गेली, असे मानेने दाखवून, असत्य सांगून त्या स्त्रीचे संरक्षण केले.
ह्या कथेत जे घटक गुंतलेले आहेत ते नीटपणे पहावे लागतील. असत्य सांगूनही तो सत्य सांगत होता असे समजावे लागते कारण, ते असत्य चांगुलपणाचे समर्थन करणारे होते. ह्याचा अर्थ हिंदूंच्या विचारसरणी नुसार चांगुलपणा म्हणजेच सत्य असे मानले जाते. कारण, त्यामुळे परमेश्र्वर त्याच्याकडे अनुकूल होतो. म्हणजे चांगुलपणा परमेश्र्वराचे द्योतक आहे तर, चांगुलपणा कोणाशी? किती? असें प्रश्र्न उपस्थित होतात. त्याची चर्चा ह्या पुस्तकाच्या दुसर्या भागात प्रश्र्नोत्तर परिशिष्टात केली आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -
वासनेच्या आहारी जाऊन खोटी साक्ष दिली तर त्याला हजारपट दंड पडेल, रागांने खोटी साक्ष दिल्यास तिप्पट, अज्ञानामुळें दिल्यास दोनशे अमर्समण, पोरकटपणाने दिल्यास शंभर अमर्समण असें दंड असावेत. १२१
न्याय व्यवस्थेबाबत जरब रहाण्यासाठी व तिची गरीमा राखण्यासाठी असें दंड खोटी साक्ष देणार्यास आवश्यक आहेत असें मनु सांगतो. नाहीतर न्याय देणे केवळ अशक्य होईल. १२२
चांगला न्यायी राजा खोटी साक्ष देणार्या ब्राह्मणास फक्त बहिष्कृत (देश सोडण्यास सांगेल) करील परंतु, इतर तीन वर्णातील असेल तर त्याला दंड व बहिष्कार अशा दोनही शिक्षा असाव्यात. १२३
स्वयंभूचा मुलगा मनु असें सांगतो किं, दहा जागा आहेत जेथे खोटी साक्ष देणार्या इतर तीन वर्णाच्या माणसास शिक्षा व्हावी, ब्राह्मणाला फक्त देश सोडून देण्यास सांगितले जाईल. १२४
त्या जागा आहेत, पोट, जिव्हा, दोनही हात, दोनही पाय, डोळे, नाक, दोनही कान, आणि सर्व शरीर. १२५
राजा गुन्ह्याचे गांभिर्य, उद्देश, काळवेळ, गुन्ह्याची जागा, अशा सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून शिक्षेचे स्वरुप व कोणत्या अवयवावर करावयाची ते ठरवेल. १२६
अन्यायकारी निकाल झाला तर राजाची प्रजेत नाचक्की होईल, त्याचा सन्मान रहाणार नाही, मृत्यूनंतर त्याला अधोगती प्राप्त होईल म्हणून असें होणार नाही ह्याची दक्षता राजांने व न्यायाधीशांनी, न्यायालयातील ब्राह्मणांनी अशा सर्वांनी घ्यावयाची असते. १२७
जो राजा निरपराध माणसाला अविचाराने शिक्षा करतो व दुर्बुद्धीमुळें गुन्हेगारास मोकळे सोडतो तो राजा ह्या जगात कायम बदनाम होतो व मृत्यू पश्र्चात रसातळाला जातो. १२८
पैशाच्या फसवणूकी बाबत पहिला गुन्हा असेल तर त्याला ताकीद देऊन सोडावे, पुन्हा केल्यास दम द्यावा व सोडून द्यावे त्यानंतर पुन्हा केला तर मात्र दंड करावा न त्यानंतर पुन्हा तो करीत राहीला तर त्याला कठोर शिक्षा करावी. १२९
एवढे करूनही तो सुधारला नाही तर त्याला ह्या सगळ्या शिक्षा एकत्रितपणे द्याव्यात. १३० टीपः ह्या सर्व शिक्षा एकत्रितपणे कशा द्याव्यात ते सांगितलेले नाही.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

हिंदू कोण – ३७

मागील भागातून पुढे
. हिंदूंतील पुनर्जन्माच्या विचाराची माहिती – पुढे चालू
आपण पहातो किं, कांहीं माणसे आयुष्यभर सचोटीने जगत असतात परंतु, त्यांच्या जीवनात केवळ दुःख लिहीलेले असते. असे होण्याचे कारण, आज जरी तो इसम सचोटीने जगत असला तरी गेल्या जन्मी त्याने बरेच खोटे काम केले असले पाहिजे व तो ते आज भोगत आहे. तसेंच ह्या जन्मातील चांगल्या कामामुळे पुढील जन्मी मात्र तो सुखात रहाणार आहे हे निश्र्चित. ह्या उलट असेसुद्धा दिसते किं, एकादा माणूस सदोदित वाईट कामात गर्क असतो तरीसुद्धा तो अगदी मजेत असतो, त्याचे कारण कर्मविपाकाच्या ह्या नियमानुसार त्यांने मागिल जन्मी चांगले काम केले होते ते तो भोगत आहे व आता जे कुकर्म करीत आहे ते तो पुढील जन्मी भोगणार आहे. कांही माणसे असे समजतात किं, ह्या जन्मीच्या कर्माची फळे ह्याच जन्मी भोगावी लागतात परंतु, ह्या समजाला हिंदूंच्या शिकवणुकीत आधार नाही, ते त्या त्या माणसांचे त्याचे सोईस्कर असें गैरसमज असतात.

५५. पुनर्जन्माचा संबंध अशारितीने लिंगदेहाशी म्हणजे पर्यायाने नशिबाशी निगडीत आहे म्हणून नशीबाच्या व्यवहाराबाबत जी माहिती आहे ती येथे देत आहे. माणसाचे नशीब व त्याचे व्यवहार पैशाच्या व्यवहारासारखे असतात. जसें पैशाच्या व्यवहारात माणूस पैसे नसतील तर कर्ज काढतो तसें नशीबसुद्धा पुण्याचे कर्ज काढून सुधारता येते, त्याबद्दलचा हिशेब कसा असतो ते पाहूया. देवता गणांकडे मोठा पुण्यसंच असतो. त्यातून कर्ज काढता येते असा समज आहे. त्यासाठी विशिष्ट पद्धतीने पुजा होत असते त्या पुजेत याचक देवतेला आश्र्वासन देतो किं, तो आवश्यक तेवढा पुण्यसंचय करून ते कर्ज फेडेल. जर ती देवता प्रसन्न झाली तर ती आपले पुण्य कर्जरुपांने भक्तांस देते असे समजले जाते. अर्थात् ते कर्ज असते म्हणजे त्याची परतफेड भक्ताला करावी लागते हे उघड असते. ती परतफेड पापमुक्त व पुण्यकारक जीवन जगून फेडता येते, असे समजले जाते. नवसात जे तो बोलतो जसें, खणा नारळानी ओटी भरीन वगैरे, तर तेवढे करून तो याचक समजतो किं, त्यांने नवस फेडला. परंतु, तो भाग नवसाचा बाह्य भाग असतो, आतील भाग जो अशा नवसांत गृहीत समजला जातो, ज्यात त्यांने पुण्य संच करण्याचे आश्र्वासन दिलेले असतें ते तसेंच राहून जाते. दुर्दैवाची गोष्ट अशी किं, कोणताही भक्त हा पवित्र नियम पाळत नाही व त्यामुळे तो मृत्युनंतर मोठ्या अडचणीत जातो. ह्यासाठी जर कोणत्याही देवतेकडे नवस करावयाचा असेल तर केवळ (बाह्य) नवस फेडण्याने त्याची सुटका होत नाही हे त्या भक्ताने लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या ह्या जन्मात कोणते काम केल्यामुळे पुढच्या जन्मी कोणते चांगले अथवा वाईट भोग भोगावे लागतील हे पहाता असें सांगता येईल कीं, हिंदू इसम, ह्या जन्मातील कामाच्या मदतीने त्याच्या पुढच्या जन्माचे भोग ठरवू शकतो. नवसाबद्दल आणखीन थोडे पाहूया. दोन याचक एका देवतेकडे नवस करतात, त्यातील एकाचा नवस पुरा होतो व दुसर्याचा होत नाही. असें होण्याचे कारण, दुसर्याचा पुण्यसंचय कमी आहे असें समजावयाचे असते. त्यासाठी खर्या हिंदूंनी पापमुक्त जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत जावे. आपली खरी लक्ष्मी आपला पुण्यसंच आहे, पैसे नाहीत. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे. कारण, पुण्यसंचय ही शाश्र्वत संपत्ती असते. पैशाची देवता कुबेर अथवा गणपती आहे व ती संपत्ती अशाश्र्वत असते. सत्कृत्यापेक्षा ध्यान साधना जसें, विपश्यना साधना, सोऽहम् साधना करण्यामुळे पुण्यसंच जास्त होत असतो म्हणून हिंदूंनी अशा साधना मध्ये आपला फावला काळ व्यतित करावा अशी अपेक्षा असते. ह्या आणि अशा अनेक गोष्टींसाठी खर्या हिंदूंनी ब्राह्मण पुरोहितांकडून मार्गदर्शन घेऊ नये कारण, तो नेहमी खोटा सल्ला देतो असा अनुभव आहे. कदाचित् त्यालासुद्धा खरे काय ते माहीत नसते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू १११ -१२०
शहाण्या माणसाने कधीही खोटी शपथ घेऊ नये. कारण, असें केल्याने त्याचा नाश ह्या जन्मात होतोच परंतु, पुढील जन्मीसुद्धा होत रहातो. १११
ब्राह्मणाला मदत करण्यासाठी, गाईसाठी गवत मिळवण्यासाठी, घरात जळण पाहिजे म्हणून, स्त्रीशी लग्न करण्यासाठी आपला वर्ण लपवण्यासाठी, भूक लागल्यास खाण्यासाठी अशा कारणांकरतां जर खोटे बोलले तर ते क्षम्य आहे. ११२
गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी, न्यायाधीश ब्राह्मणाला त्याच्या वर्णाची शपथ घ्यावयास लावेल. क्षत्रियास त्याच्या रथाची, शस्त्रांची, घोड्याची शपथ घ्यावयास लावेल. वैश्यास त्याच्या खजिन्याची, धान्याची, सोन्याची शपथ घ्यावयास लावेल. शूद्रास त्याच्या डोक्याची शपथ घ्यावयास लावेल. ११३
तेवढ्याने नाही झाले तर न्यायाधीश त्या साक्षीदाराला अग्नी परीक्षा, जल परीक्षा घ्यावयास लावू शकतो. शेवटी त्यांना त्यांच्या बायका मुलांची शपथ घ्यावयास लावू शकतो. चुकीचा वर्ण धरून शपथ घ्यावयास न्यायाधीशांने सांगितले तर तो न्यायाधीश नरकात जाईल. ११४
अग्नी परीक्षेत ज्याला आग जाळत नाही, जो पाण्यात राहू शकतो, ज्याला कांहीं ईजा होत नाही तो निष्पाप समजावा. ११५
उदाहरणार्थ, जेव्हां वत्साला त्याच्या भावाने आरोप केला तेव्हां अग्नी (अग्नी देवांचा हेर समजला जातो) परीक्षेत त्याच्या केसालाही आगीने स्पर्श केला नव्हता, कारण तो निरपराधी होता. ११६
जेव्हां खोटी साक्ष दिली आहे असें समजेल तेव्हां न्यायाधीश निकाल उलटवेल व जो कांहीं निकाल ठरला होता तो रद्द होईल. ११७
लोभीपणाने, अस्वस्थ मनाने, भिऊन, दोस्तासाठी, वासनेपायी, रागांत, अज्ञानामुळें, पोरकटपणामुळे जी साक्ष दिली जाते ती अग्राह्य ठरेल. ११८
मी आता सांगतो, जर वरील कारणांमुळें खोटी साक्ष दिली तर त्या साक्षीदाराला कोणती सजा द्यावयाची. ११९
लोभामुळे जो खोटी साक्ष देतो त्यास एक हजार पना (त्या काळातील रुपयासारखी मुद्रा) दंड करावा. जो अस्वस्थ मनाने साक्ष देईल त्याला सर्वात कमी (एक अमर्समण) दंड करावा. भिऊन देणार्यास त्यापेक्षा थोडी जास्त, दोस्ती अथवा वासनेपोटी दिल्यास त्याच्या चौपट दंड करावा. १२० टीपः अमर्समण हे त्या काळातील सर्वात कमी मुल्य असलेले नाणे (आजचा एक पैसा) होते.

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

हिंदू कोण – ३६

मागील भागातून पुढे
. हिंदूंतील पुनर्जन्माच्या विचाराची माहिती –
५३. कांहीं शहाणे सांगतात किं, ते, हे सर्व मानत नाहीत. मुद्दा येथे असा आहे कीं, हे जग कोणाच्या मानण्यानुसार चालते ते आपल्याला विचारात घ्यावयाचे असते. जर तुमच्या मानण्यानुसार हे जग चालत असते म्हणजे तुम्हीच देव असतां तर तुमच्या मानण्या न मानण्याचा विचार करणे उचीत ठरले असते पण हे जग तुमच्या मानण्या न मानण्यानुसार चालत नसल्याने तुम्ही काय मानता अथवा मानत नाही ह्याला बिलकूत महत्व रहात नाही. म्हणून कोण माणूस काय मानतो अथवा नाही मानत ह्याचा विचार करण्याला किंमत खरे हिंदू देत नाहीत. हिंदू माणसें निसर्गाला अथवा निसर्गरुपी ईश्र्वराला काय मंजूर आहे त्याचा अंदाज घेणे उचीत समजतात. ह्यासाठी, कोण (माणूस) काय मानतो अथवा नाही मानत ह्याची चर्चा शहाणे हिंदू करीत नाहीत. गेल्या अनेक पिढ्यांच्या एकत्रित अनुभवानुसार जे ज्ञानानुभव हिंदूंच्या परंपरांत स्वीकारले गेले आहे, तेंच आपण मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारत असतो. त्यानुसार पुनर्जन्म माणसाचा होतो हे हिंदू स्वीकारतात. आधुनिक विज्ञानाने जीव ही देहाची रासायनिक चेतना (chemical intelligence) आहे हे जनुकद्रव्य डिएने (DNA) वरील संशोधनाने सिद्ध केले आहे. ह्यावरून हिंदू विचार किती शास्त्रशुद्ध प्रमाणांवर आधारीत आहे हे स्पष्ट होते. इतर धर्माप्रमाणे हिंदू, केवळ कल्पनारम्य गोष्टींत रहात नाही हे समजून घ्यावे लागेल.
शेवटी एक गोष्ट सर्व हिंदूंनी समजून घेतली पाहिजे ती अशी किं, आपण जे जन्मलो आहोत ते आपल्यातील ईश्र्वराला म्हणजे आत्मारामाला, ओळखण्यासाठी आहे, देहाचे भोग घेण्यात रमण्यासाठी (वेळ फुकट घालवण्यासाठी) नाही. जर ही जाणीव ओळखून हिंदू आपले जीवन जगतील तर त्या हिंदूचे कल्याण होईल. खरा हिंदू तो, जो ही जाणीव ठेवून सावधपणे आपले जीवन व्यतीत करतो.
५४. पुनर्जन्मावरून लिंगदेहाचे प्रयोजन काय ते समजते, ते थोडे पहाणे योग्य वाटते, ते असें, आपल्या आयुष्यात आपण षड्रिपुंच्या (काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर) आहारी जाऊन बर्याच चांगल्या वाईट गोष्टी करीत असतो. त्यांचा लेखाजोखा म्हणजे लिंगदेह. माणूस जो जन्मतो तो हा लेखाजोखा, नशीब रुपांने बरोबर घेऊनच. प्रत्येक माणसाचे पूर्वजन्माचे हिशोब त्याच्या कर्मानुसार भिन्न असणार, त्याप्रमाणे त्यांचे नशीबसुद्धा वेगवेगळे असणार. म्हणून प्रत्येक माणसाचे आयुष्य वेगवेगळे असते. कोणी श्रीमंत जन्मतो तर कोणी गरीब, कोणी सुंदर असतो तर कोणी कुरुप असतो. सगळी माणसे कधीच एकसारखी नसतात, दोन माणसे कधीच एकसारखी दिसतसुद्धा नाहीत ह्याचे कारण, त्यांचे लिंगदेह वेगवेगळे असतात. इतर प्राण्यांच्या बाबत तसें नसते. ते सर्व सारखेच दिसतात. कारण त्यांच्यात फक्त देह व जीव असतात, आत्मा व त्याबरोबर लिंगदेह तेथे नसतात. त्यांना पुनर्जन्म नसतो. फक्त माणसाच्या बाबत हा कर्माचा लेखाजोखा (लिंगदेह) आत्म्याला चिकटून असण्याचे कारण, निसर्गात कर्मविपाकाचा सिद्धांत कार्यरत आहे असे मानतात. कर्मविपाकाच्या नियमानुसार, माणसाच्या प्रत्येक कृतीची समसमान प्रतिक्रिया तिच्या तीव्रतेनुसार उत्पन्न होणे क्रमप्राप्त असते. चांगल्या कामाची चांगली व वाईट कामाची वाईट प्रतिक्रिया उत्पन्न होणे स्वाभाविक असते. गेल्या जन्मातील कर्मांच्या प्रतिक्रिया ह्या जन्मात उमटत असतात. हे असें त्याच जन्मात उमटणे ताबडतोब शक्य नसते कारण, त्यासाठी बरेच हिशोब शक्तिसातत्याच्या नियमांनुसार व्हावे लागतात. त्यामुळे ती प्रतिक्रिया पुढच्या जन्मीच उमटणे शक्य होते. ते शक्य होण्यासाठी हा लेखाजोखा आत्म्याबरोबर येणे जरुरीचे असते. तसेंच त्यासाठी आत्म्याला पुनः जन्म घेणे सुद्धा बंधनकारक ठरते. जो माणूस आपल्या जीवनात कांहीं चांगले अथवा वाईट काम करतो त्याचा परिणाम स्वरूप त्याच्या लिंगदेहातील नोंदणींमध्ये बदल होऊन त्याप्रमाणे दुरुस्त्या होत असतात. शेवटी मरतांना जे अंतिम रुप लिंगदेहाचे असते ते घेऊन तो आत्मा तो देह सोडून बाहेर पडतो. म्हणजे एकाद्या माणसाचा लिंगदेह तो जन्मला तेव्हां जसा होता तसा तो मरतांना नसतो. अशारितीने आत्म्याचा लिंगदेह सतत उत्क्रांत होत असतो. आधुनिक विज्ञानाप्रमाणे माणसाचा डिएनेसुद्धा अशाच प्रकारे बदलत असतो व माणसाचा डिएने तो जन्मला तेव्हां जसा होता तसा मरतांना नसतो. कदाचित् असे असेल किं, ह्या डिएनेमध्ये लिंगदेहाची सुद्धा नोंद होत असावी. ह्यावरून हिंदू शास्त्रे विज्ञानानुसार जास्त योग्य ठरतात. असें इतर धर्मांबाबत आढळत नाही. आपला आत्ताचा जन्म गेल्या जन्माच्या कर्मविपाकाप्रमाणे असतो त्यात फेरबदल करता येत नाही. म्हणजे आपण आपले नशीब बदलू शकत नाही. गेल्या जन्मी केलेल्या पापकर्मामुळे जर अंधत्व ह्या जन्मी प्राप्त झाले असेल तर त्यात कोणताही बदल आपणहून स्वतः आपण करू शकत नाही. परंतु, दैविक शक्तींच्या मदतीने ते कदाचित् शक्य असते. शाक्तांच्या शिकवणूकीत हे सांगितले आहे. आत्म्याला लिंग नसते परंतु, ह्या लिंगदेहामुळे तो जन्मतो तो त्याच्या लिंगदेहाचे लिंग घेऊन येतो. म्हणून ह्याला लिंगदेह असे म्हणतात. जेव्हां आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो तेव्हां हा लिंगदेह, कर्मविपाकाचा हिशोब शक्तिसातत्याच्या नियमानुसार संपुष्टात आल्यामुळे नाहीसा झालेला असतो. हिशोबाच्या भाषेत बोलावयाचे तर असें म्हणता येईल किं, कर्मविपाकाची निव्वळ बाकी शुन्य झाल्याने तो आत्मा मोक्षपदाला जातो. गौतम बुद्धानेसुद्धा हा कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य केलेला आहे. एवढी माहिती पुनर्जन्माचे प्रयोजन समजण्यासाठी पुरेशी आहे असें मला वाटते, त्यापेक्षा जास्त माहितीसाठी वाचकांनी शाक्तांतील तंत्रविद्येचा सविस्तर अभ्यास करावा. ह्या माहिती वरून हिंदू आपला पुढचा जन्म कसा असावा ते ठरवू शकतो. संपूर्ण जीवन पापविरहीत जगल्यांने अतिशय चांगला पुनर्जन्म आपण मिळवू शकतो असे हिंदूंच्या शिकवणूकीत दिले आहे. उत्तर आयुष्यासाठी, म्हातारपणासाठी, जसें आपण बचत करतो तसेंच कांहींसे हे आहे. कर्मविपाकाची परतफेड शक्तिसातत्याच्या सिद्धांतानुसार (जेवढ्यास तेवढी) होत असते व म्हणून जगात कधीही अन्याय होत नाही सर्व हिशोबाने होत असते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – १०१ -११०
खोट्या शपथेवर जे कांहीं दुष्कृत्य घडले त्या सर्वाची पूर्ण माहिती जी तुला आहे, जे दिसले व जे ऐकलेस ते सांगून टाक. १०१
जे ब्राह्मण गुरं पाळतात, जे ब्राह्मण व्यापर करतात, जे कारागीरी करतात, जे अभिनयाचे काम करतात, जे गातांत, जे नोकर्या करतात, जे सावकारी करतात, अशा सर्व ब्राह्मणांना शुद्र ठरवून त्याप्रमाणे त्यांची साक्ष घ्यावयाची असते. १०२
टीपः आजचे सर्वच ब्राह्मण जातीचे लोक ह्या नियमांनुसार शुद्र ठरतात.
जर एकादा माणूस हिताचा मुद्दा लक्षात घेऊन चांगल्या उद्देशाने खोटे बोलेल तर तो देवांसाठी तसे बोलतो आहे असें समजावे कारम त्याला पाप लागत नाही. त्याचा स्वर्ग त्याला मिळेल. १०३
टीपः सत्यापेक्षा हित जास्त श्रेष्ठ समजले आहे.
खरे बोलण्यामुळे जर कोण्या निरपराध शुद्राचा वैश्याचा क्षत्रियाचा अथवा ब्राह्मणाचा मृत्यू ओढवणार असेल तर त्यापेक्षा हितकारक खोटे बरे असते. म्हणून त्याप्रमाणे साक्ष देण्यास परवानगी आहे. १०४
अशारितीने हिपासाठी खोटी साक्ष देणार्याने नंतर सरस्वती देवीच्या नांवाने एक पिंड (कारू) अर्पण करावा व त्याचे प्रायश्र्चित्त करावे. अशारितीने तो सरस्वती देवीची क्षमा मागतो. असे केल्याने त्या खोटे बोलण्याचे त्याला पाप लागत नाही. १०५
पवित्र नियमानुसार, असा साक्षीदार साजूक तुपाचे अर्ध्य पवित्र अग्नीला वाहिल, कुशमांड वाचेल, ऋचा ज्या वरूणाला लिहील्या आहेत त्यांचे वाचन करील (त्यात लिहीले आहे, अहो वरूण देवा, तुझ्या बंधनातून माझी मुक्तता कर). अथवा पाण्याला वाहिलेली कडवी गाईल. म्हणजे तो त्या पापातून मुक्त होईल. १०६
जो माणूस आजारी असल्याचे सोंग घेऊन साक्ष देण्यास येण्याचे टाळतो व जर तो तीन पंधरवड्यात साक्ष देण्यास आला नाही तर तो गुन्ह्यात सामील आहे असा अर्थ करून त्यालासुद्धा कर्जाची परतफेड करावी लागेल अथवा कर्जाचा दहावा भाग एवढा दंड राजाच्या खजिन्यात भरावा लागेल. १०७
साक्षीदाराने साक्ष दिल्याच्या आठवड्यात तो आजारी झाला अथवा त्याच्या गराला आग लागली, अथवा त्याचा मृत्यू झाला तर त्याने खोटी साक्ष दिली असें धरून त्याला कर्जाची परतफेड करावी लागेल. १०८
दोघांतील वादांत कोणी साक्षीदार नसेल व त्यात खरा कोण व खोटा कोण ते समजणे अशक्य झाले तर अशा परिस्थितीत शपथेवर बोलण्यास सांगून खरे काय ते ओळखावे. १०९
थोर ऋषीमुनीसुद्धा शपथेवर खरे खोटे शोधत होते, वसिष्ठ ऋषीनी पिग्वनाचा मुलगा राजा सुदासापुढे अशीच शपथ घेऊन त्यांचे शंका समाधान केले होते. ११०

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी