शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

हिंदू कोण – ६२

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतर चे जीवन –
७६. प्रत्येक माणसाचा जीवनाच्या अखेर मृत्यू येणे क्रमप्राप्त असते. हिंदू परंपरेनुसार मेल्यानंतर ते शरीर अग्निसंस्कार करून नष्ट करायाचे असते. असे करण्या मागील कारण समजून घेऊ या. मृत्यूनंतर त्याचा आत्मा शरीराबाहेर त्या शरीराभोवती घुटमळत असतो. असे समजतात किं, एका सुक्ष्म तंतूनी त्याचा लिंगदेह त्याच्या उरस्थीस पकडून रहातो. जर तो देह जाळून टाकला तर तो बंध संपुष्टात येऊन तो आत्मा त्या देहाच्या बंधनातून मुक्त होतो. परंतु जर तो देह तसांच कुजत ठेवला तर तो देह पूर्णपणे कुजून नष्ट होईस्तोवर तो आत्मा व त्याचा लिंगदेह तसांच तेथे तडफडत रहातो. कुजल्या नंतर सुद्धा जोपर्यंत त्याची उरस्थी शाबूत आहे तोवर तो आत्मा त्या ठिकाणी तडफडत रहातो. त्यामुळे त्या प्रेतात्म्याचा उद्धार होत नाही. म्हणून हिंदूंत मृत्यूनंतर देहास अग्निसंस्कार करणे आवश्यक समजले जाते. जारण मारण विद्येत मृताची उरस्थी वापरून त्यात अडकलेला प्रेतात्मा पकडून त्याला गुलाम करण्याची पद्धत आहे. म्हणून जितक्या लवकर मृत देह नष्ट करता येईल तितक्या लवकर तो जाळून नष्ट करावयाचा असतो.
हिंदू मान्यतेनुसार माणूस मेल्यावर त्याचा प्रेतयोनीत प्रवेश होत असतो. म्हणजे मेल्या बरोबर त्याचा आत्मा लिंगदेहासह प्रेतात रुपांतरीत होतो. देह नुकताच सोडलेला असल्यामुळे तो आत्मा संभ्रामावस्थेत असतो. त्याच्या भोवती आघीच मेलेल्या माणसांची भूतं जमा होतात व त्याचे मुल्यमापन करू लागतात. हे असें होते जसें विद्यापीठात नव्याने जाणार्या विद्यार्थ्याचे मुल्यमापन जुने विद्यार्थी करतात. मला म्हणावयाचे किं, ती जुनी भूतं त्या नवीन प्रेताचे मानव योनीतील स्थान अजमावण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व मृत्यूनंतर दहा दिवसानंतर सुरु होत असते. म्हणजे मृत्यूनंतर ताबडतोबचे दहा दिवस तो मजेत असतो. ह्या दहा दिवसांत तो संभ्रमावस्थेतून बाहेर आलेला असतो. जेव्हां अशी चाचपणी सुरु होते तेव्हां त्या मृतात्म्याची खरी परीक्षा सुरु होत असते. हल्ली आपण जे रॅगिंग म्हणतो तो जाच त्या नवीन प्रेताचा सुरु होतो. हा काळ त्या भूतासाठी नवीन व मोठा त्रासदायक असतो. ज्या मृतात्म्याचे पृथ्वीवरील आप्त त्याला त्याच्या मृत्यूनंतर आठवून त्याला प्रेमांने आणि सन्मानपूर्वकपणे अर्ध्य देतात त्या मृतात्म्याचा जाच होत नाही पण ज्याचे आप्त त्याला विसरतात अशा मृतात्म्याचा फार जाच होतो. त्यामुळे तो मृतात्मा आपल्या पृथ्वीवरील आप्तांस शाप देतो. अशा शापामुळे त्या आप्तांना अनेकप्रकारचे त्रास भोगावे लागतात. ते कुटुंब अनेक प्रकारच्या अडचणीत पडते कारण, मेलेला माणूस म्हणजे त्याचे प्रेत फार शक्तिमान असते असें समजले जाते. त्यात जर तो मृत माणूस असंतुष्ट आत्मा असेल तर त्याचा शाप विशेष त्रासदायक असतो. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंच्या शास्त्रात मृतात्म्याचे श्राद्ध चांगल्या रितीने सन्मानपूर्वक असे करावे असें सांगितले आहे. मग तो मृत इसम जीवंतपणी कितीही मामुली असो. कांहीं हिंदू त्याची शांति करतात व ते योग्य असते. त्या मृत इसमाकडे त्याच्या जीवंतपणी आप्त मंडळींनी दुर्लक्ष केले असेल तर, ती व्यक्ति मेल्यावर मात्र असें दुर्लक्ष करणे कुटुंबास हानिकरक ठरू शकते. हिंदूंनी शक्यतर कोणाचाही कधीही अवमान करू नये. अशारितीने, जेव्हा मृत व्यक्ति त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्याने संतुष्ट होते तेव्हां ती आप्तांस आशिर्वाद देते, तो आशिर्वाद त्या आप्तांस त्यांच्या दैनंदिन जीवनात महत्वपूर्ण असतो. ह्यासाठी हिंदूंमध्ये मृतांचे श्राद्ध करणे आवश्यक समजले जाते. मृत व्यक्ति केव्हा मेली त्या दिनांकानुसार श्राद्ध करणे चांगले पण ते शक्य नसेल तर पितृपक्षात न विसरता श्राद्ध करावे. जस जसे काळ सरकतो व मृत व्यक्तिचे पिशाच्च बनते तसें कदाचित श्राद्ध न करतां फक्त शिधा अथवा पिंडदान करून आपला आदर व्यक्त केला तरी ते पुरेसे असते. कारण आता तो मृतात्मा जुना झालेला असतो, त्याला इतर पिशाच्च सतावू शकत नाहीत. त्यातसुद्धा जर ती व्यक्ति सात्त्विक होती असे असेल तर त्याच्या पिशाच्चास विशेष अधिकार प्राप्त झालेले असण्याची शक्यता असते. जसा काळ सरकतो तसें त्या पिशाच्चास आप्तांची गरज उरत नाही व बहुतेक वेळा असे पिशाच्च त्या कुटुंबास विसरून जाते. कांहींवेळा त्याचा पुनर्जन्म होत असतो, असें झाले किं, त्याचे श्राद्ध करणे अथवा पिंडदान करणे निरर्थक असते. कांहीं वेळा मृतात्मा एकाद्याच्या स्वप्नात येऊन कांहीं मामुली इच्छा सांगतो, तसें झाले तर मात्र ती इच्छा त्वरीत पूर्ण करावी. येथे आप्त म्हणजे केवळ नातेवाईक असे नाही तर त्या व्यक्तिचे मित्रसुद्धा समजावेत. येथे माझे कांहीं अनुभव नमुद करतो त्यामुळे हा विषय समजणे अधिक सोपे होईल.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू -
हल्ला करणार्यावर प्रतिहल्ला करणे हा दोष नाही. मग ते सर्वांसमक्ष असो अथवा खाजगीत असो, तो क्षत्रियत्व समजावे. ३५१
जे पुरूष परस्त्रीशी लगट करतांत त्यांना राजा प्रथम भिती वाटेल अशी शिक्षा करील व तरी त्याच्यात सुधार झाला नाही तर त्या पुरूषाला बहिष्कृत केले जाईल. ३५२
व्यभिचारामुळें वर्ण व्यवस्था बिघडते. वर्णसंकर होतो, त्यातून पापबुद्धी, बेजबाबदारपणा वाढतो. त्यामुळें सर्वनाश होतो ३५३
जो माणूस एकादा व्यभिचार करतांना पकडला गेला आहे व आता पुन्हा दुसर्यांदा बाईशी लगट करतांना पकडला गेला तर अशा माणसाला खालच्या अमर्समण इतका दंड करावा. ३५४
पण जो माणूस कोणत्याही व्यभिचाराचा उद्देश न ठेवता परस्त्रीशी कांहीं योग्य कारणासाठी बोलेल तो निर्दोषी समजला जाईल. ३५५
जर कोणी पुरूष तीर्थक्षेत्री, गांवाबाहेर, नदीच्या तटावर, जंगलात, अशा जागी परस्त्रीशी बोलण्याचा प्रयत्न करील तर त्याला व्यभिचाराचा (समग्रहण) प्रयत्न केला म्हणून आरोपाखाली शिक्षा होऊ शकते. ३५६
परस्त्रीला भेटवस्तु देण्याचा प्रयत्न करणे, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, तिच्या भोवती पिंगा घालणे, तिच्या अलंकाराची स्तुती करणे, तिच्या शय्येजवळ जाण्याचा प्रयत्न करणे, ही सगळी समग्रहण केल्याची लक्षणं समजावीत. ३५७
परस्त्रीच्या खाजगी भागांना तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे अथवा तिला आपल्या अंगास स्पर्श करण्यास सांगणे अशा सर्व गोष्टी समग्रहण दोषात येतात. ३५८
समग्रहणाचा आरोप असलेला इसम देहदेडास पात्र होतो. त्यासाठी चारही वर्णांच्या स्त्रियांस फार जपून ठेवावे लागते. ३५९
वैद्य, कवी, वेदाचा अभ्यास करणारा, चित्रकार, सोनार, कासार हे लोक कामा निमित्ताने परस्त्रीशी बोलू शकतात. ३६०

क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.