सोमवार, ११ जून, २०१८

हिंदू कोण – ५४

मागील भागातून पुढे –
११. विचार करण्या बाबतचे मार्गदर्शन –
विचारांबाबत कांहीं गोष्टी विशेष लक्षात घ्यावयाच्या असतात त्या अशा, जेव्हा आपण एकाद्या ज्ञानेंद्रियावर आपले लक्ष एकचित्ताने केंद्रीत करतो त्यावेळी आपण कोणताही इतर विचार करू शकत नाही. म्हणजे समजा तुम्ही एकादे गाणे एकचित्ताने ऐकत असाल तर त्या क्षणी तुम्ही इतर कोणताही विचार करू शकत नाही. म्हणजे जर विचार करणे बंद करावयाचे असेल तर कोणत्याही एका ज्ञानेंद्रियावर आपले लक्ष केंद्रित करावयाचे असते. ते ज्ञानेंद्रिय कान असेल अथवा डोळा असेल, त्वचा असेल, किंवा नाक असेल, जीभ असेल, किंवा तुमचा श्र्वासोंश्र्वास असेल.
दुसरा विचार प्रक्रियेचा गुण असा किं, एका वेळी एकच विचार मनांत असतो. जसें समजा तुम्ही जप करत आहात, त्यावर एकचित्त झाले आहे असें झाले असेल तर त्यावेळी बाकी सर्व विचार बंद झालेले असतात.
तिसरा गुण असा किं. विचार प्रक्रिया सवय प्रधान असते. म्हणजे एका प्रकारे विचार करण्याची जर तुम्हाला सवय झाली तर तुमच्या मेंदूत आपसूकपणे तेंच तेंच विचार येत रहातात. योग्य विचारांची सवय करण्याने चांगल्या सवयी आपण स्वताला लावू शकतो. समजा तुम्ही लैंगिक विचार करण्याची सवय लावली तर तेंच तेंच विचार येत रहातात व तुम्ही त्या वासनेत अडकत जाता. समजा तुम्ही तुमच्या आराध्य दैवतेचा जप करण्याची सवय मेंदूला लावली तर तुमचा मेंदू सतत जप करीत राहील व इतर विचार येणे बंद होईल. हिंदूंच्या अध्यात्म साधनेत विचारांचे हे तीन गुण हुशारीने वापरून साधक चांगली प्रगती करू शकतो. माणसाचे विचार प्रथम परा वाणीत व्यक्त होत असतात. नंतर ते इतर वाणींत येतात. हे असें जरी असले तरी जीव त्याच्या देह संवर्धनार्थ जे आवश्यक विचार उत्पन्न करतो ते विचार नेहमीच प्राथमिकतेने मेंदूत येत असतात. आपण नेहमी अनुभवतो किं, विचारशुन्य अवस्थेत असतांना अचानक भलतेंच विचार उसळी मारून मेंदूत येतात. ते साधकाला मोठे आव्हान असते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही विचारशुन्य अवस्थेत आहात व तुम्हाला भूक लागली तर मेंदूत खाण्याचे विचार उसळी मारून येतात.
हिंदूंना आपले जीवन सुखी व्हावे असें वाटत असेल तर त्यांने त्याच्या विचारांचे सुयोग्य नियमन व नियंत्रण करण्याची सवय स्वताला लावावी लागेल. त्यासाठी कांहीं प्रश्र्न त्यांनी त्याच्या मेंदूत येणार्या विचारांबद्दल विचारावयाचे असतात. ते असें, हा विचार माझ्या डोक्यात कां आला? कोठून आला? कसा आला? अशारितीने जर बिनकामाचे विचार येत असतील तर असें प्रश्र्न विचारू लागल्यास ते वाह्यात विचार येणे सवयीने बंद होते. आपल्या डोक्यात बिनकामाच्या विचारांची संख्या जास्त असेल तर त्यांचे नियंत्रण करणे जरुरीचे असते. बिनकामाच्या विचारांमुळे मानसिक व्यसने लागतात. तसेंच अशा विचारांमुळे कांहीं दैहीक व्यसनेसुद्धा लागतात.
विचार हे सर्वच गोष्टींचे मूळ असल्याकारणांने हिंदूंना त्यांच्या विचाराचे चांगले व्यवस्थापन करता आले पाहिजे. अधिक चर्चा मनाचे विचार मध्ये आहे ती पहावी.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २७१ -२८०
जर शूद्र द्विजाबद्दल अपमानकारक बोलला तर, लोखंटाचा खिळा दहा अंगुले इतका लांब असा लाल करून त्याच्या तोंडात खुपसावा अशी शिक्षा असावी. २७१
जर शुद्र द्विजाला त्याचे कार्य काय ते सांगण्याच उद्धटपणा करील तर राजा त्याच्या तोंडात व कानात गरम तेल ओतेल. २७२
जर कोणी खोटी निर्भत्साना एकाद्याच्या जातीची, कुळाची, त्याच्या हक्काची, करील तर त्याला दोनशे पना दंड भरावा लागेल. २७३
जग कोणी दुसर्याला जरी खरे असले तरी दुखवण्याच्या उद्देशाने काण्या, लुळ्या, लंगड्या, असें हिणवण्याचा प्रयत्न करील तर त्या गुन्ह्यासाठी तसें हिणवणार्याला एक कर्षपना दंड होईल. २७४
जो स्वताच्या माता, पिता, बंधू, बहिण, मुलगा, शिक्षक ह्यांचा अपमान करतो त्याला शंभर पना दंड होईल. २७५
जर ब्राह्मण, व क्षत्रिय ह्यांत भांडण झाले व त्यात त्या दोघांनी एकमेकांस शिवीगाळी केली तर त्यातील ब्राह्मणाला खालचा अमसर्पण दंड होईल. क्षत्रियाला मधला अमसर्पण दंड होईल २७६
वैश्य व शूद्र ह्यांच्या शिक्षा त्यांच्या वर्णानुसार त्या प्रमाणात असतील. अशा परिस्थितीत शूद्राची जिभ कापली जाणार नाही हे निश्र्चित २७७
अशारितीने बदनामीचे नियम पाहिले. आता हल्ला झाला तर काय निर्णय घ्यावयाचा ते पहावयाचे आहे. २७८
जर हलक्या जातीच्या माणसांने पायाने इतर वरच्या जातीच्या मामसास लाथ मारली तर त्याचा तो पाय छाटून टाकावा असें मनू सांगतो. २७९
जर हाताने हल्ला केला (काठी वगैरे घेऊन) तर तो हात कापून टाकावा. जर रागाच्या भरात त्यांने लाथ मारली तर त्याचे ते पाउल छाटून टाकावे. २८०
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.