बुधवार, २९ जुलै, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा- ११

मागुन पुढे चालू - मनुस्मृतीचा पहिला भाग संपला असून आता दुसरा भाग आपण पहाणार आहोत.
हे पवित्र नियम जे वेदाचे ज्ञान असलेले लोक मानतात व त्याचे पालन करुन उच्च पदाला पोहोचले आहेत, जे द्वेष, वाह्यात प्रेमात फसत नाहीत,
केवळ वासनापूर्तीसाठी प्रेरीत होत नाहीत, केवळ ज्ञानासाठी वेदाचा अभ्यास करतात, त्यात दिलेल्या पद्धतीने आचरण करतात २
वासना निर्माण होण्याचे कारण ती वासनापूर्ण होईल अशी अपेक्षा असते, तेवढ्यासाठी दाने करतात, शपथा घेतात, कारण त्यांना असे वाटते किं असे केल्याने त्या वासना पूर्ण होतील.
येथे दिलेल्या सर्व इच्छा वासना पूर्तीसाठीच आसतात. मनुष्य जे काही करतो ते सर्व त्याच्या इच्छापूर्ती साठीच असते हे सर्वांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
येथे दिलेले कर्मकांड जर सचोटीने व नित्यनियमांने पार पाडतील तर ते अमर होतील अथवा जीवनात पूर्णतया यशस्वी होतील.
हे लक्षात असावे किं वेद सर्व ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे. त्याशिवाय सत्शील आचरण, संतांचे मार्गदर्शन, स्वताचे अनुभव अशांच्या एकत्रित प्रभावाने जीवनाचे मार्गदर्शन होत असते.
मनुने जो नियम सांगितला तो वेदानुसारच असतो, कारण तो मनु सर्वज्ञानी आहे.
जरी असे साधारणपणे असले तरी जाणकारांनी कालमानानुसार सारासार विचार करुन मगच त्यांचे पालन करावयाचे असते. (म्हणजे सांगकाम्याप्रमाणे करु नये.)
जो वेदातील आज्ञांचे पालन करुन त्याप्रमाणे आचरण करतो तो मृत्युलोकात ख्यातनाम होतो व मृत्युनंतर उत्तम गती प्राप्त करतो.
श्रुति म्हणजे ऐकलेले ज्ञान व स्मृति म्हणजे परंपरेने आलेले ज्ञान, अशा दोघांबद्दल कोणीही संशय बाळगून त्यांचा अवमान करु नये. त्यात दिलेल्या आदेशांचे पालन करावे करण पवित्र नियम त्यांतुनच तयार झाले आहेत १०
जे कोणी प्रत्येक द्विज (क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य हे सर्व द्विज समजले जातात) वेदांबद्दल (श्रुति, स्मृति) अनादर बाळगून वागतात त्यांना सर्व लोकांनी वेदांचा द्वेष्टा म्हणून दूर करावे. ११


मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com 

सोमवार, २० जुलै, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-१०

मागुन पुढे चालू - मनुस्मृतीचा पहिला भाग संपला असून आता दुसरा भाग आपण पहाणार आहोत. त्या आधी काही माहिती पाहू या.
एकंदर भाग बारा आहेत.
) पहिल्या भागात विश्र्वाची निर्मिती आणि द्विजांची कर्तव्ये सांगितली आता
) दुसर्या भागांपासून नंतरच्या पांच भागांत आपण दैनंदीन कामे व इतर विधी, विवाह जीवन, कुटूंबाची व गृहस्थाश्रमाची कर्तव्ये, नंतरच्या वानप्रस्थाश्रमातील जीवन ह्याबद्दल सुचना दिल्या आहेत.
) सातव्या व आठव्या भागात राजाची व सैन्याची व्यवस्था, कर्तव्ये ह्याबद्दल दिले आहे.
) नवव्या भागात कायदा कानु आणि न्यायनिवाडे ह्या बद्दल सांगितले आहे.
) दहाव्या भागात जाती व्यवस्था, समाज व्यवस्था आणि राज्य व्यवस्था ह्या बद्दल सांगितले आहे.
) अकराव्या व बाराव्या भागात व्यक्ती आणि समाजाची नैतिक कर्तव्ये कोणती ते दिले आहे. त्याशिवाय अध्यात्म, तत्वज्ञान ह्याचा विचार केला आहे. त्यात पाप, पुण्य, पश्चात्ताप, तत्वशिलता, संन्यास आणि तपस्या ह्याची माहिती दिली आहे.
) बाराव्या भागात मनुस्मृतीतील पवित्र नियम बदलण्या बाबात मार्गदर्शन केले आहे. म्हणजे हे नियम कालमानानुसार बदलण्याची मुभा आहे व ते नित्य नाहीत असे दाखवले आहे.
हिंदू मान्यता उत्क्रांत होतात म्हणजे, कालाच्या अनुसराने बदलतात. तसे ईस्लाम व इतर मध्यपूर्वेतील धर्मांत होत नाही. म्हणून शंभर वर्षापूर्वीची हिंदूमान्यता व आजचा ह्यांच्या चालीरीतीत बराच फरक आढळतो. (उदाहरणार्थ, शंभर वर्षापूर्वी विधवा विवाह होणे शक्य नव्हते आज ते होऊ शकतात.) तसे ईस्लाम अथवा ख्रिस्ती धर्मात होत नाही. हिंदू परंपरा एकाद्या वृक्षाप्रमाणे नेहमी ताज्या असतात. इतर धर्माच्या परंपरा एकाद्या पुतळ्या प्रमाणे न बदलणार्या असतात. म्हणजे जरी वृक्ष अनेक वर्षाचा जुना असला तरी त्याच्या फांद्या, पाने, डाहळ्या अगदी ताज्या असतात. त्या उलट पुतळ्याचे सर्व भाग त्या पुतळ्या इतकेच जुने असतात. जर वृक्षाची फांदी मोडली तर लवकरच त्या जागी नवीन फांदी उगवते तसे पुतळ्या बाबत होत नसते. जर एकादा भाग मोडला तर तेथे नवीन भाग येत नाही. हिंदू मान्यता उत्क्रांत होणार्या आहे तर इतर धर्म जडवादी आहेत. एकदा कोणी संस्थापकानी काही सांगितले कीं त्यात कोणताही बदल होत नाही. हा महत्वाचा फरक इतर धर्म व हिंदू मान्यता ह्यात आहे. दुर्दैवाने नंतरच्या काळात ब्राह्मणांनी त्याला जड करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला त्याला पुन्हा उत्क्रांत करावा लागेल. त्यासाठी मनुस्मृतीचा अभ्यास होणे आवश्यक ठरते म्हणून हा प्रपंच मांडला आहे.
उपलब्ध माहितीनुसार मनुस्मृती इसवी सन पूर्व १५०० वर्षे लिहीली गेली.
पुढील पोस्ट पासून दुसर्या भागाचा विचार करावयाचा आहे.
मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com 

गुरुवार, ९ जुलै, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-९

मागुन पुढे चालू -
खर्या ज्ञानी ब्राह्मणाने हे नियम शिकून त्याचे व्यवस्थितपणे पालन करून ते दुसर्या योग्य ब्राह्मणास शिकवून त्याची परंपरा पुढे चालू ठेवावी. १०३
जो ब्राह्मण असे करतो तो कधीही पाप कर्मात (जे आचार, विचार आहार ह्यांच्यामुळे घडतात) अडकत नाही. १०४
तो त्याच्या आधीच्या नंतरच्या अनेक पिढ्यांचे कोटकल्याण करतो त्याला ह्या सृष्टीचा मालक समजावे. १०५
ह्या पवित्र नियमांचे पालन करणारा त्याच्या जीवनात सुखी, संपन्न समाधानी होईल. १०६
ह्या संहितेत पवित्र नियमां बरोबर इतर नैतिक नियम दिले आहेत, ज्याच्या पालनाने माणसाचे जीवन सुखी संपन्न होईल. १०७
नैतिकतेचे नियम सामान्य अकलेचा भाग असतात, ते कोठेही लिहून ठेवलेले नसतात, ते समजणे त्यांचे पालन करणे साधारण सत्प्रवृत्त माणसास अवघड नाही, म्हणून स्वाभिमानी सत्प्रवृत्त माणसाने त्यांचे पालन करावे कमी बुद्धी असलेल्यांना ते समजावून सांगावयाचे असतात. १०८
जो ब्राह्मण त्यांचे पालन करणार नाही तो जरी वेद जाणत असला तरी तो कोरडाच रहातो, जो त्यांचे पालन करतो तो जरी वेद शिकलेला नसला तरी यशस्वी ठरतो. १०९
ज्या ऋषीनी ओळखले कीं, पवित्र नियमांचे मुळ ह्या नितीनियमांत आहे ते ह्या नितीनियमांचे पालन उत्तम रीत्या करतात तत्वशिलता प्राप्त करतात. ११०
विश्वाच्या निर्मितीचे नियम, पुजेचे नियम, विद्यार्थ्याच्या बाबतचे नियम, गुरू बाबतचे नियम, गुरूकडून आल्यावर स्नान करण्याचे नियम, १११
विवाहाचे नियम, विवाह विधीचे नियम, ज्ञानाविषयीचे नियम, अंत्यविधीचे नियम, ११२
विद्यार्थी अवस्थेत राहतांना काय खावे काय खाऊ नये, माणसाचे तसेंच इतर गोष्टींचे शुद्धीकरण कसे करावे, ११३
तत्वशिलतेचे स्त्रियांनी पालन करण्याचे नियम, अंतिम मुक्ती त्याबाबतचे नियम, ज्ञान मिळविण्याबाबतचे नियम, राजाने त्याचे काम कसें करावे, ११४
साक्षीदाराची तपासणी कशी करावी, पति-पत्नी ह्यांच्या संबंधाबाबतचे नियम, वारसा हक्काबाबतचे नियम, द्युत खेळाचे नियम, नको असलेल्या लोकांचा काटा काढण्याचे नियम, ११५
वैश्याने शुद्राने आपली कामे कशी करावीत, मिश्रवर्णाच्या लोकांनी पाळावयाचे, सर्व जातीजमातीने पाळावयाचे नियम, ११६
देशांतराचे नियम, अंतिम ज्ञानाच्या अवस्थेची माहिती, चांगले वाईट वागण्याबाबतचे नियम त्याचे नियमन कसे करावे त्याची माहिती, ११७
देशातील जाती, प्रांत ह्या बाबतचे नियम, व्यापार तत्सम बाबींचे नियम अशी सर्व माहिती मनुने ह्या संहितेत दिली आहे. ११८
भृगुच्या विनंतीनुसार मनुने हे सर्व नियम तयार करून दिले आहेत ते सर्व आता तुम्ही शिकावेत. ११९


मनुस्मृती भाग पहिला पुढील पोस्ट मध्ये चालू -


माझा इमेल ashokkothare@gmail.com