मंगळवार, २४ जुलै, २०१८

हिंदू कोण – ५६

मागील भागातून पुढे –
१३. अध्यात्म साधनेच्या विविध पद्धतींबद्दल -
६९. ह्यात आपण "प्रापंचिकाची अध्यात्म साधना", ह्या विषयाची माहिती करून घ्यावयाची आहे. प्रापंचिकाची अध्यात्म साधना व मोक्षार्थीची अध्यात्म साधना ह्यातील मोठा फरक असां किं, प्रापंचिक इसम संसारात गुंतलेल्या अवस्थेत ती साधना करीत असतो व मोक्षार्थी बहुधा प्रपंचापासून मुक्त असे जीवन जगत असतो, त्याला प्रपंचाच्या विवंचना नसतात. प्रापंचिकाच्या अध्यात्म साधनेचा मुळ उद्देश असा असतों किं, जीवाच्या कामापासून आत्म्याने दूर रहावे. ते समजण्यासाठी जीवाचे षड्विकार व आत्म्याचे, ह्यातील फरक प्रथम समजून घ्यावे लागतील. म्हणजे, जीवाचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर अशा सहा प्रेरणा व आत्म्याचे तेंच सहा विकार ह्यातील फरक काय ते लक्षात घ्यावयाचे असते. जेव्हां ते आत्म्याला असतात तेव्हां त्यांना षड्रिपू (सहा शत्रू) असे सांगतात पण जेव्हां ते जीवाचे असतात तेव्हां त्याना सहा शत्रू असें सांगितले जात नाही उलट सहाय्यक समजले जाते. ह्याचे कारण आपल्याला समजून घ्यावे लागेल. क्रोध, मद व मत्सर जीवाच्या संरक्षणासाठी असतात व काम, लोभ आणि मोह देहाच्या संवर्धनासाठी असतात. म्हणजे, प्रापंचिक हिंदूंच्या अध्यात्म साधनेत ह्यांचे व्यवस्थापन हांच मुख्य विषय असतो. देव वगैरे गोष्टी तेवढ्या महत्वाच्या नसतात. कारण, हिंदूमध्ये देव मानणारे व न मानणारे असें दोन प्रकारचे असतात. अशा दोघांनाही आचरणात आणता येईल अशी साधना असावी लागते. ह्यासाठी आपण प्रथम ह्या सहांची सविस्तर माहिती पहावयाची आहे. त्यासाठी हिंदू कोणचा दुसरा भाग पाहा. प्रापंचिकाच्या अध्यात्म साधनेचा उद्देश प्रामुख्याने पापमुक्त व पुण्यकारक जीवन जगण्याचा असतो. जेणे करण पुढचे जीवन सुखमय होवो. मोक्षार्थीचा उद्देश लिंगदेहा पासून मुक्ती मिळवणे असा असतो. तरीसुद्धा दोघांच्या साधनांत बरेच साम्य असते.
क्रमशः पुढे चालू –

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू २९१ -३००
नाकातील वेसण तुटली, जोखड, जोखदेड, जु मोडले, वाहून उलटून पडले, जर आंस मोडला तर अशावेळी जो अपघात होतो २९१
जर चामड्याची वादी, दोर माने भोवतीची बांगडी तुटली, आणि सारथ्याने जोरांने ओरडून सावध केले असेल, आणि असें करूनही अपघात झाला तर त्यासाठी कोणलाही दंड मारता येणार नाही. असें मनु सांगतो. २९२
जर सारथ्याच्या चुकीमुळें रथ उलटला अथवा रस्त्याबाहेर गेला आणि त्यामुळें नुकसान झाले तर रथाच्या मालकास दोनशे पना दंड भरावा लागेल. २९३
जर सारथी अनुभवी आहे असें दिसले व त्याने हलगर्जीपणा केला असें सिद्ध झाले तर सारथ्याला दंड भरावा लागेल. जर सारथी नवशिका असेल तर त्याबरोबर रथातून प्रवास करणार्या उतारूससुद्धा दंड पडेल.२९४
रस्त्याने जाणार्या जनावरांमुळें अथवा दुसरा रथ आडवा आला व म्हणून त्याचा रथ थांबला असेल व त्यामुळें मृत्यू ओढवला असेल तर त्या सारथ्याला निश्र्चितच दंड भरावा लागेल. २९५
जर माणूस मेला तर त्या सारथ्याला चोरी केल्याप्रमाणे दंड व्हावा, तसेंच जर त्याच्या कडून मोठे जनावर, गांव. हत्ती, उंट, घोडा मारला गेला तर त्याच्या अर्धी शिक्षा होईल. २९६
लहान प्राण्यास इजा झाली तर दोनशे पना दंड आहे. सुंदर जंगली पक्षांस मारले व चतुष्पाद मारले गेले तर पन्नास पना दंड पडेल. २९७
गाढव, खेचर, शेळी, मेंढी मारले गोले तर पांच मशल दंड पडेल. कुत्रा, डुक्कर मारले गेलो तर एक णशल दंड आहे. २९८
पत्नी, मुलगा, गुलाम, विद्यार्थी, लहान भाऊ, असें रक्ताचे नातेवाईक त्यात सामील असतील तर त्यांना दोनशे अथवा फाटक्या बांबूने फटके मारण्याची शिक्षा असावी. २९९
फटके पाठीवर मारावेत पण पुढे मारले तर मारणारा सुद्धा त्याच शिक्षेल (चोरीची शिक्षा) पात्र होतो. ३००
क्रमशः चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

सोमवार, २ जुलै, २०१८

हिंदू कोण – ५५

मागील भागातून पुढे –
१२. शुभ मुहूर्ता बाबत –

६८. हिंदूंच्या बर्याच गोष्टी शुभ व अशुभ मुहूर्तावर अवलंबून असतात. कोणतेही काम करावयाचे म्हणजे त्यासाठी सुमुहूर्त पहाणे हि एक हिंदूंसाठी नित्याची बाब असते. त्यासाठी भटाला बोलावून त्याच्या कडून पंचांग पाहून शुभ मुहूर्त शोधून त्या वेळी ते काम करण्याचा प्रघात आहे. नियोजित काम यशस्वी व्हावे म्हणून हे सर्व करतात. एवढे करूनही बर्याच वेळी काम बिघडते असा अनुभव आहे. मुहूर्त पहाण्या मागील उद्देश असा असतो किं, आपल्या सर्व कामांवर ग्रहांचा प्रभाव असतो व योग्य मुहूर्त पाहून काम केले किं, ग्रह अनुकूल होतात असा समज आहे.
ह्या संदर्भात एक गोष्ट साईबाबांची सांगतात ती अशी किं, एकदा त्या गांवाचा पाटील आपल्या मुलाचे लग्न काढतो. त्यासाठी सुमुहूर्त पहाण्या आधी तो बाबांस भेटतो व आपला मानस त्यांना सांगतो. बाबा त्याला सांगतात किं, मुहूर्त कशासाठी पहावयाचा? करून टाक लग्न लवकर, त्यावर पाटील ते मानत नाही व भटाकडून मुहूर्त काढून मुलाचे लग्न उरकतो. एक वर्षात त्याचा मुलगा मरतो, त्यावर बाबांकडे तो दुःखी अंतःकरणांने जाऊन तक्रार करतो तेव्हां बाबा त्याला सांगतात किं, तू जर मी सांगितल्याप्रमाणे पटकन लग्न केले असतेस तर हे झाले नसते पण तू माझे ऐकले नाही. त्यानंतर बाबांनी जे प्रबोधन केले ते असे कीं, देवाच्या खर्या भक्तांने मुहूर्तासारख्या गोष्टी आपल्या देवावर सोडाव्यात. माणूस जर मुहूर्त पाहून काम करील तर त्यात चुका होतातच. त्याला अनेक कारणे असू शकतात, पंचांग चुकीचे असणे, भटाचे ज्ञान कमी असणे, घडाळ्यातील वेळ चुकीची असणे अशी कितीतरी कारणे असू शकतात. तात्पर्य असें किं, हिंदूंनी आपले काम करीत जावे. जशी वेळ येईल तसे काम करीत जावे. काम प्रामाणिकपणे बिनचुक करण्यावर भर असावा बाकीच्या गोष्टी आपल्या देवावर सोडाव्यात म्हणजे अशी वेळ आली नसती. बाबांच्या मते सर्ववेळा चांगल्याच असतात पण आपले प्राक्तन जर खोटे असेल तर कितीही चांगला मुहूर्त काढून ते काम केले तरी ते फसण्याची शक्यता असते. परंतु, जर देवाची कृपा असेल तर मुहूर्त चुकीचा घेतला तरी कांहीं बिघडत नाही. त्यावर तो पाटील बोलला, तुम्ही आमचे देव, तरी असे कसें झाले? त्यावर बाबा बोलले, अरे वेड्या, मी तुला पटकन लग्न उरकण्यास सांगितले होते पण तू ते (देवाचे) ऐकलेस कां? मी तुला तोच मुहूर्त दिला होता त्यावर तू मुलाचे लग्न केलं नाहीस त्याला मी काय करणार?
तात्पर्य असें किं, आपले काम करीत जा, वेळ देवावर सोडून त्याला स्मरून प्रामाणिकपणे काम करीत जाणे हेंच माणसांचे काम असते. साईबाबांचा हा संदेश हिंदूंनी लक्षात ठेवून आपली कामे करावीत. शुभ मुहूर्त शोधण्यात वेळ घालवू नये. गीतेतसुद्धा तसेंच सांगितले आहे, "कर्मण्ये वाधिकारेस्ते....
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू २८१ -२९०
हलक्या कुळातील माणूस जर वरच्या कुळातील माणसाच्या जागी बसण्याचा प्रयत्न करील तर त्याच्या कुल्यावर तापलेल्या सळींने चटका द्यावा. तसेंच राजा त्याच्या मागच्या भागावर तो बहिष्कृत झाल्याचे डाग देऊन नंतर त्याला गांवातून हाकलून देईल. २८१
उद्धटपणे तर शुद्र वरिष्ठ लोकांशी बोलला अथवा त्यांच्यावर थुकला तर त्याचे दोनही ओठ छाटून टाकावेत. जर त्याने लघवी केली तर त्याचा तो अवयव छाटून टाकावा. जर तो पादला तर त्याचे गुदद्वार कापून टाकावे. २८२
जर त्याने (हलक्या जातीचा) उच्च जातीच्या माणसाचे केस पकडले तर राजाने त्याचे हात छाटून टाकावेत. तसेंच ज्या अवयवाने तो उपमर्द करील तो अवयव कापून टाकावा. २८३
समान जातीच्या माणसाचे रक्त काढले अथवा इजा केली तर त्याला पन्नास पना दंड करावा. स्नेयू कापला तर दंज सहा निष्क असावा. परंतु हाड मोडले तर त्याला बहिष्कृत करावे. २८४
निरनिराळ्या वृक्षांच्या उपयुक्ततेनुसार त्यांना इजा करणार्यास दंड सुचवले आहेत. ते ठरलेले आहेत. २८५
जर कोणी दुसर्याला अथवा प्राण्याला फटका मारला तर तसे करणार्यास त्या फटक्याने किती त्रास धाला त्याप्रमाणे शासन करावे. २८६
जर अवयव दुखावला असेल, जखम झाली असेल, रक्तस्त्राव झाला असेल तर ज्याला त्रास झाला त्याला त्रास देणारा नुकसार भरपाई करील. त्याशिवाय राजा दंड आकारील. २८७
जो कोणी दुसर्याच्या गोष्टीचे नुकसान करील त्याला त्याची भरपाई करावी लागेल. त्याशिवाय नुकसानी एवढा दंड राजा वसुल करील. तो खजिन्यात जाईल. २८८
चामड्याच्या वस्तुचे नुकसान केले असेल तर त्याच्या किमतीच्या पांचपट एवढा दंड भरावा लागेल. त्याशिवाय तशी दुसरी आणून द्यावा लागेल. हाच नियम लाकडाच्या मातीच्या, धातूच्या तसेच फुलं, फळं कंदमुळं ह्यांना लागू होतो. २८९
वाहन, सारथी व मालक ह्यांबाबतच्या बद्दल कांही दहा गोष्टी आहेत कीं, त्यांसाठी कोणतीही भरपाई करावा लागणार नाही. इतर बाबतीत दंड राजाकडून सांगितला जाईल. २९०

क्रमश: पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी