गुरुवार, १ मार्च, २०१८

हिंदू कोण – ४८

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
मंडण मिश्राची पत्नी शंकरापुढे येऊन बसली तिने पहिलाच प्रश्र्न स्त्री-पुरुष संबंधाबाबतचा विचारला. शंकर ब्रह्मचारी पूर्ण संन्यासी, त्याला त्यात कांहीही समजत नव्हते. तो उत्तर देऊ शकला नाही. त्याच्या भोवती इतर विवाहीत वेश्यागमनी ब्राह्मण अनुयायी होते पण अटीनुसार तो त्यांची मदत घेऊ शकला नाही. अशारितीने पहिल्या फेरीत शंकर प्रथमच हरला. त्यानंतर आणखीन चार फेर्या झाल्या त्यातसुद्धा तो हरला. वादाच्या अटींतील चौथ्या अटीमुळे शंकरास मंडण मिश्राच्या पत्नीस प्रश्र्न विचारण्याची संधीच मिळाली नव्हती. शेवटी शंकर हरल्याचे अधिकृतरित्या मान्य झाले शंकराला ठरल्याप्रमाणे सर्व अटी मान्य करण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. अशारितीने शंकराला मुख्य मानणारे सर्व ब्राह्मण शाकाहारी झाले जैनांचे स्वामित्व स्वीकारले. हा शंकाराचा पराभव एक छळ कपट होता पण ब्राह्मणांनी तो मान्य केलेला दिसतोय. त्यानंतर ब्राह्मणांनी अनेक धर्मग्रंथांत आणि पोथ्यांत फेरफार करून देवदेवताच्या नैवेद्यात मांसाहारा ऐवजी शाकाहार सुचवण्यास सुरुवात केली. गाय बदलून तेथे गौ म्हणजे गहू असें बदल केले मुळच्या मांसाहारी ब्राह्मणधर्माचे शाकाहारीकरण केले. सर्व यज्ञ विधींमध्ये सुद्धा बदल केले गेले त्यांचेसुद्धा शाकाहारीकरण करण्यात आले. ब्राह्मण जैन ह्यांच्यातील साटें लोटें विविध प्रसंगी दिसून येतात. जैनांच्या विविध विधींची नक्कल करण्यात आली जसें, पर्युषण काळात ऋषीपंचमी साजरी होऊ लागली. आजही ब्राह्मण जैनांच्यापुढे नतमस्तक होऊनच छुपे जैन झाले आहेत असें दिसते. हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक विधीत पौरोहित्य करण्याचा हक्क ब्राह्मणांना उरलेला नाही. अशा परिस्थितीत हिंदूंच्या अज्ञानाचा ब्राह्मण फायदा घेऊन हिंदूंच्या देवतांच्या पुजा करण्याचा धंदा करीत आहेत. हे पाहिल्यानंतर हे ब्राह्मण पुरोहित हिंदू लोकांना विविध वारी तिथ्यांना शाकाहार करावयांस कां सांगतात ते समजते. असें सांगतात किं, मंडणमिश्राच्या पत्नीच्या अप्रतिम नखशिखांत लावण्याच्या दर्शनाने तरूण वयातील शंकर पाघळून गेला शरणागती स्वीकारून ती घालील त्या अटी त्यांने मान्य केल्या. शेवटी सांगावयाचे किं, हिंदूंनी आधी दिल्याप्रमाणे आहाराचे पांच नियम पाळावेत बाकी सर्व गोष्टी (वार, तिथ्या इत्यादि) निरर्थक समजाव्यात. कांहीं हौस म्हणून वार, उपवास इत्यादि पाळतात, जर त्यामुळे त्यांना आनंद मिळत असेल तर तसें करण्यास हरकत नसावी. त्यांना धर्माचा भाग समजण्याची आवश्यकता नाही.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २११ -२२०
ह्या प्रमाणे हिस्से करण्याचा नियम आहे जेव्हां हे पुरोहित एकत्रितपणे काम करतात. २११
पुण्यकर्मासाठी जर एका माणसांने दुसर्या माणसांस पैसे दिले पण ते पैसे त्या कामासाठी वापरले गेल नाहीत तर ते दान खोटे ठरते. असें पैसे घेणारा चोर ठरतोव त्याप्रमाणे त्याला चोरी केल्याची शिक्षा होईल. २१२
जर असा चोर खोटे सोंग घेऊन पुण्याच्या कामाता बाऊ करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करील तर राजा त्याला एक सुवर्ण इतरा दंट करील. २१३
आतापर्यंत कायदेशीर व्यवहार दाना बाबतचा व दक्षिणे बद्दलचा कसा असावा ते सांगितले. पुढे पाहू, वेतन न देण्याबद्दलचे नियम काय आहेत. २१४
काम करण्याचे आश्र्वासन देऊन जो सेवक कामावर विनाकारण हजर गहात नाही त्याला आठ क्रिश्नला इतका देड राजा मारील व त्याला वेतन मिळणार नाही. २१५
परंतु, जर तो सकारण गैरहजर राहिला व नंतर कामावर येऊन सर्व काम केले तर त्याला सर्व कितीही काळ गेला तरी ते वेतन मिळेल. २१६
जर तो नोकर सकारण अथवा विनाकारण आपले काम अर्धवट सोडून गेला व ते काम दुसर्याला करावे लागले तर त्याला वेतन मिळणार नाही. केलेल्या कामाचे सुद्धा वेतर मिळणार नाही. २१७
अशारितीने वेतन कसें व कां द्यावे त्याबद्दलचे नियम पाहिले. आता करार मोडण्याचे बाबतचे नियम काय ते पहावयाचे आहेत. २१८
राज्यात रहाणारा इसम जेव्हां एकादा करार शपथेवर करतो व नंतर तो पाळत नाही त्या इसमास राजानें राज्यातून घालवून द्यावे. २१९
नाहीतर त्याला कैद करून त्याला सहा निष्क, चार सुवर्ण आणि एक सत्मण इतका दंड करावा त्याला त्या नंतर सोडून द्यावे. २२०
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा