शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

हिंदू कोण – ४२

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
खाटीकांत प्राण्याला जीवे मारणारा व नंतरची कामे करणारा असें दोन असतात. त्यातील जीवे मारणारा विनावेदना मारण्याच्या तंत्रात प्रशिक्षित असावा म्हणजे हिंसा टाळता येईल. इस्लाम मध्येसुद्धा जीवे मारणारा मौलवी असावा लागतो कारण त्या धर्मातसुद्धा प्राण्याचा मृत्यू विनावेदना झाला पाहिजे असा दंडक आहे. तो मौलवी मारतांना अल्लाह कडे क्षमा मागणारी आयता बोलतो व नंतर ती हत्त्या त्याच्या कुवतीनुसार करतो पण आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे किं, हे कार्य पूर्णपणे विनावेदना करणे शक्य झाले आहे. त्यामुळे तो प्रश्र्न आता रहात नाही. मनुस्मृतीतसुद्धा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांनी बळी द्यावेत असें सांगितले आहे ते ह्यांच कारणांने असावे असें वाटते. एका उपनिषदात एक तपस्वी एका खाटकाचे काम करणार्या ज्ञानी ऋषीस विचारतो, "हे प्राणी मारण्याचे काम तुम्ही कां करता"? त्यावर तो ऋषी सांगतो, "मी हे प्राणी विनावेदना मारतो, जर ते मी नाही केले तर कोणी अज्ञानी ह्या प्राण्यांना सवेदना मारील ते होऊ नये म्हणून मी हे काम करीत आहे. निसर्गाने माणसाला उभयाहारी केले असल्याने मांसाहार करणे माणसांस बंधनकारक आहे तसें न करणे पापकारक आहे".
६१. निसर्गाचा गाडा सुरळीतपणे चालण्यासाठी आधी जन्मलेले जीव मरणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी संत पीटरला एक साक्षात्कार झाला होता त्याची गोष्ट पहावी लागेल. येशुचा संदेश पसरवण्याचे काम करतांना संत पीटर गांवेगांवी भटकत होता. त्याला लोक प्राणी मारून खातात हे अयोग्य वाटल्याने त्याने त्याच्या अनुयायांना मांसाहार न करण्यास सांगितले. असेंच एकदा तो एका गांवी दुपारी ध्यानस्थ बसला असतां, त्याला साक्षात्कार झाला. त्याला त्यात एक सफेद चादर आकाशातून खाली जमिनीवर येतांना दिसली. त्या चादरीवर सर्वप्रकारचे खाद्य प्राणी फिरत होते. पीटरला त्या साक्षात्काराचा अर्थ समजला नाही. तो परमेश्र्वराला विचारतो, "हे काय प्रभू", त्यावर आकाशातून आवाज आला किं,
"हे सर्व प्राणी माणसांने खावयाचे असा आदेश आहे कारण, मनुष्य हा देवांने उत्पन्न केलेला एक मोठा भक्षक प्राणी असून त्याचे काम हे प्राणी खाऊन त्यांची भरमसाटपणे वाढणारी संख्या नियंत्रित करावयाची असें असते. निसर्गातील प्रत्येक प्राण्यास कांहीं काम नेमून दिले आहे व माणसांस जी अनेक कामे दिली आहेत त्यातील हे एक आहे. अर्थात्, खाण्याशिवाय इतर कारणांने जर त्यांने प्राणी मारले तर ते मात्र पाप ठरेत. खाण्यासाठी मारले तर ते पाप ठरत नाही म्हणून तू व तुझे अनुयायी ह्यापुढे मांसाहार करतील".
त्या साक्षात्कारा नंतर पीटरने त्याच्या अनुयायांस मांसाहार करण्यास सांगितले.

६२. मनुस्मृतीतसुद्धा तशाच स्वरुपाचा आदेश दिला आहे. कोणी कोणाला खावयाचे ह्याबद्दल तेथे सुचना आहेत. जीवो जीवस्य जीवनम्, हे तत्त्व हिंदूंनी स्वीकारलेले आहे. येथे मी संत पीटरची गोष्ट सांगितली कारण आपण हिंदू, जगातील सर्वच संतांचा आदर करतो व त्यांची शिकवण विचारात घेण्यास मोकळे आहोत. अनेक विविध विचार आत्मसात करणे हा हिंदूंचा हक्क आहे. केवळ भारतीयच सूत्रातून विचार आला तर तो स्वीकारावयाचा एरवी नाही असें हिंदू मानत नाहीत. म्हणूनच अल्लाह व येशू ह्यांना आपण उत्क्रांतवादी हिंदू सन्मानाने वागवतो. ब्राह्मणांना ते शक्य नसते. त्यांच्यातील मांगासलेपणा त्यांना ते करू देत नाही. अशा गोष्टी ते प्रतिष्ठेच्या करतात. आतापर्यंत अनेक पंथ व धर्म, हिंदूंनी आत्मसात करून हिंदू परंपरेत समाविष्ट केलेले आहेत. असेंच एक दिवस येईल, जेव्हां ईस्लाम व ख्रिस्ती, हिंदूंत विरघळून समाविष्ट झालेले दिसतील तेव्हां आश्र्चर्य वाटावयाचे कारण नाही. कारण, हिंदू परंपरा मुलतः सर्वग्राही आणि अनंत आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी किं, ब्राह्मणांच्या हस्तक्षेपामुळे हिंदूंची ही शक्ति आज काम करीत नाही.
मनुस्मृतीच्या पांचवा भागांत ब्राह्मणांनी मांसाहार करण्याबाबतची जी माहिती आहे ती अशी,
अशारितीने द्विजांनी कोणते व कसें खावे ते सविस्तरपणे पाहिले. आता खाण्याचे नियम व मांस खाणे केव्हा टाळावे ते पहावयाचे आहे. २६:
मांस (मिठाच्या) पाण्याने शिंपून शुद्ध केल्यावर खाण्यास योग्य होते. ते करतांना मंत्राने तो विधी संपन्न करावा. तसेंच जेव्हां ब्राह्मणाला मांस खाण्याची इच्छा होईल, मंत्रविधीपूर्वक यज्ञ करतांना व प्रकृती सुधारण्यासाठी त्यांने मांसाहार करावा. २७ :
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -
परिणामतः जर राजाने जे करू (घेऊ) नये ते केले (घेतले) व जे करावयास (घ्यावयास) पाहिजे ते केले नाही तर तो कमजोर समजला जातो व ह्या जगात आणि नंतरच्या जगात सुद्धा नष्ट होईल. १७१
राजाने आपला हक्क घेऊन वर्णातील भेदांचे स्तोम न वाजवता सर्वांचे संरक्षण केले तर तो समृद्ध होईल आणि मृत्यू नंतर सुखात राहिल. १७२
यमदेवाप्रमाणे, राजाने आपल्या आवडी नावडीची विशेष दखल न घेता क्रोधावर नियंत्रण ठेवून काम केले पाहिजे. १७३
परंतु, जो राजा दुष्ट बुद्धीने जाणून बुजून चुकीचे निर्णय घेतो आणि अन्याय पसरवतो तो शत्रू कडून लवकरच हरवला जातो. १७४
प्रेम आणि हेवा ह्यांच्या मध्ये न फसता जो राजा न्यायबुद्धीने राज्यकारभार चालवतो तो प्रजेचे मन जिंकतो, ती त्याच्या जवळ जाते जसें नदी समुद्राकडे जाते. १७५
ऋणकोने राजाकडे तक्रार केली कीं, त्याचा धनको राजाच्या आज्ञेबाहेर जाऊन वसुली करतो तर राजा त्याला मुद्दलाच्या चौथा भाग एवढा दंड करील आणि धनको त्यांचे मुद्दल परत करील. १७६
ऋणको जर धनकोच्या वर्णाचा अथवा खालच्या वर्णाचा असेल तर तो कर्जाची परतफेड मेहनत घेऊन करू शकतो परंतु, उच्च वर्णाचा असेल तर मात्र सावकाशपणे तो ती परतफेड पैशानेच करील. १७७
नियमानुसार राजा समबुद्धीने लोकांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न साक्षी पुराव्यांच्या मदतीने करील. १७८
शहाणा माणूस त्याची ठेव चांगल्या कुटूंबातील, चांगली वर्तणूक असल्ल्या, कायदे जाणणार्या, सज्जन, चांगल्या परिवारातील असलेल्या, प्रतिष्ठीत (आर्य) माणसाकडे ठेवील. १७९
ज्या स्वरुपात ठेव दिली असेल त्याच स्वरुपात ती परत केली गेली पाहिजे. १८० टीपः पैसे असतील तर पैसे, गाय असेल तर गाय असें परतफेडले पाहिजेत.

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू –
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा