शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

हिंदू कोण – ४१

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
६०. शाकाहाराचे खुळ प्रथम जुनाट जैन प्रणालीत सुरु झाले. जैन प्रणाली अहंकारावर अवलंबून आहे. मांसाहारास विरोध सुरु झाला कारण, असा एक गैरसमज पसरवण्यात आला किं, मांसाहार करण्यासाठी प्रथम त्या प्राण्याची जी हत्या करावी लागते त्या हत्येत हिंसा असतें. जैन तत्त्वज्ञाना प्रमाणे, हिंसा करणे पाप समजले जाते. जैन तत्त्वज्ञानात कोठेही हत्या करू नये असे सांगितलेले नाही फक्त हिंसा न करण्याचा संकल्प असतो. तसेंच मांस खाऊ नये असेही सांगितलेले नाही. परंतु, हिंसा केल्याशिवाय हत्या होत नाही असा एक गैरसमज होता व हिंसा आणि हत्या ह्यातील फरक लक्षात घेतला गेला नाही. एका दृष्टीने ते बरोबर होते कारण, त्या काळात विनावेदना हत्या करणे आजच्या सारखे शक्य नव्हते. त्याकारणांने हत्या व हिंसा हे समान समजले गेले. बदलत्या काळात व विज्ञानाच्या प्रगतीमुळे विनावेदना हत्या करणे शक्य झाले आहे. म्हणजे, एकवीसाव्या शतकांत हत्या व हिंसा हे एकच राहिलेले नाहीत. म्हणजे अगदी जैन विचारांनुसारसुद्धा विनावेदना हत्या पाप ठरत नाही. हिंदू सर्व प्रकारच्या हिंसांना पाप समजत नाहीत हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. कारण, हिंदूंच्या विचारानुसार जर हिंसा अध्यात्मिक र्हासास कारण होत नसेल तर ती हिंसा पाप ठरत नाही व म्हणून ती हिंसा करण्यास हरकत नसते. हिंसा करण्याची इच्छा नसतांना इतर कारणांमुळे हिंसा झाली तर ती हिंसासुद्धा पाप ठरत नाही. उदाहरणार्थ, खाटीक हिंसा करतो पण ती हिंसा त्याला करण्याची इच्छा नसते केवळ एक कर्तव्य म्हणून तो ती नाईलाजाने करीत असतो म्हणून अशा हिंसेला पाप समजले जात नाही. दुसरे उदाहरण युद्धात लढणार्या योद्ध्याचे घेता येईल. तो युद्धात अनेकांना ठार मारतो पण त्या सर्व हिंसा करण्याचा त्याचा उद्देश नसतो. गीतेत श्री कृष्णानी त्याच कारणांने अर्जुनांस युद्ध करण्याचा आदेस दिला आहे. रस्त्याने चालतांना अनेक छोटे प्राणी मारले जातात, श्र्वासोंश्र्वास करतांना असंख्य सुक्ष्म जीव मारले जातात, त्यांत हिंसा करण्याचा उद्देश नसतो म्हणून त्यांमुळे पाप लागत नाही. आजारी माणसास बरे करण्यासाठी शरीरातील लक्षावधी रोगजंतु मारावे लागतात त्यांत हिंसा करण्याचा उद्देश नसतांना जर हिंसात्मक हत्या झाली तरी ती पाप ठरत नाही. विशेष म्हणजे, हिंसा करण्याचा उद्देश आहे व मनांने ती हिंसा केलीसुद्धा परंतु, प्रत्यक्ष हिंसा जरी झाली नसली तरी ते पाप ठरते. पापाचा उद्देश हा प्रमुख मुद्दा असतो हे पहाता, जर पाप होत नसेल तर अगदी सवेदना हत्या सुद्धा झाली तरी हरकत नसते. निसर्ग सतत हिंसात्मक हत्त्या करीत असतो कारण हत्या झाल्याशिवाय जीवनक्रम चालू रहात नाही. पण त्याचा उद्देश हिंसा करण्याचा नसल्यामुळे त्या हिंसा वैध ठरतात. हा जैन व हिंदू विचारांतील महत्वाचा फरक आहे. गीतेतील विवेचनानुसार माणूस कधीही कोणाचीही हत्या करू शकत नाही. तो केवळ कारणमात्र असतो. एकादी गोष्ट पापकारक आहे कीं नाही ते ठरवण्यासाठी, हिंदूंत उद्देश काय आहे, ते महत्वाचे समजतात परंतु, जैन कृती (उद्देश असो अगर नसो) महत्वाची समजतात. अशा कारणांने जैन विचार हिंदूंच्या मानाने निकृष्ट ठरतो. शेवटी हिंसा अथवा अहिंसा ह्याचा संबंध पाप पुण्याशी आहे व जर पाप होत नसेल तर ती हिंसा वैध ठरते हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यांत आणखीन एक प्रश्र्न पुढे येतो तो असा की, हिंसात्मक हत्या जीव करतो किं, आत्मा करतो? जर त्या क्रियेत जीवाबरोबर आत्मा सामील असेल तरच ते कृत्य आत्म्यास बाधते, एरवी नाही कारण, जीवाला पाप व पुण्य दोन्हीही लागू होत नाहीत कारण जीव हे एक रासायनिक तत्त्व आहे. ह्याच कारणांसाठी इतर मांसाहारी प्राणी जी हिंसात्मक हत्त्या करतात त्यामुळे त्यांत पाप नसते कारण त्या प्राण्यात आत्मा नसतो. ह्या वरून खाटीक व योद्धा हिंसात्मक हत्त्या करूनही निष्पाप रहातात त्याचे कारण समजते तें असें, त्यांचे जीव ते करीत असतात व त्यांचा आत्मा त्या हिंसाचरात गुंतलेला नसतो. दुसर्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनास म्हणजे त्याच्या जीवांस युद्ध करण्यास सांगितले व त्याच्या आत्म्यास मात्र त्या पासून विमुक्त रहावे असें सांगितले आहे. गीतेत श्रीकृष्ण कोणता सल्ला अर्जुनाच्या जीवाला देतो व कोणता त्याच्या आत्म्याला देतो हे तपासले तर एक वेगळी गीता दृष्टोत्पत्तीस येते.
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – १६१ -१७०
हमीदार मेला आहे व सर्व इतर गोष्टी माहित आहेत अशा परिस्थितीत धनको कर्ज काढणार्याच्या मुलाकडून वसुली करण्याचे अधिकार मिळवू शकतो. १६१
जर हमीदाराने ऋणकोकडून सर्व रक्कम वसुल केली आहे आणि त्याच्याकडे परतफेड करण्याची पुरेशी ताकद आहे असें असेल तर, त्याच्या वारसांने ते कर्ज व त्यावरील व्याज फेडले पाहिजे असा सर्वमान्य नियम आहे. १६२
व्यसनी, वेडा (भ्रमिष्ट), दुर्धर रोगांने पिडलेला, परावलंबी, लहान मुलगा, अतिवृद्ध माणूस, आणि अलधिकृत माणसें अशांनी केलेला करार मान्य होणार नाही. १६३
सर्वमान्य मुल्ये व प्रस्थापित नियम ह्यांच्या विरुद्ध असें नियम अटी असलेला करार (सिद्ध झाला तरी) अवैध समजला जाईल व त्याची अंमलबजावणी होणार नाही. १६४
फसवणूक आहे असें गहाणपत्र,भेटवस्तु, किंवा कोणतेही करार अवैध प्रकारचे केलेले न्यायालयापुढे सिद्ध झाले तर तो सर्व व्यवहार बाद ठरतो. १६५
ऋणको मेला आहे परंतु, त्याने काढलेल्या कर्जाचा उपभोग त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे असें स्पष्टपणे सिद्ध झाले तर ते कर्ज व्याजासकट फेडण्याची जबाबदारी त्या नातेवाईकावर पडते. १६६
कुटूंबावर अवलंबून असलेल्या माणसांने जर कुटूंबासाठी कर्ज काढले असेल तर त्याची भरपाई त्या कुटूंबाच्या प्रमुखास जरी तो परदेशी असला तरी घ्यावयाची असते. १६७
जबरदस्तीने केलेले करारनामे, व्यवहार, मनुने सर्वस्वी अवैध ठरविले आहेत. १६८
तीन माणसांचे नुकसान एका माणसाच्या चुकीमुळे होत असते ते साक्षीदार, हमीदार व न्यायाधीश आहेत तसेंच त्यामुळे फायदा होत असतो चार जणांचा ते आहेत, ब्राह्मण, व्यापारी, सावकार व राजा! १६९
राजाने जे प्रजेकडून घेऊ नये ते त्यांने कधीच घेऊ नये व जे त्यांने घेतले पाहिजे ते त्यांने घेतलेच पाहिजे, मग त्या गोष्टी किती मोठ्या आहेत अथवा लहान आहेत ते महत्वाचे नसते. १७०
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा