सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

हिंदू कोण – ३६

मागील भागातून पुढे
. हिंदूंतील पुनर्जन्माच्या विचाराची माहिती –
५३. कांहीं शहाणे सांगतात किं, ते, हे सर्व मानत नाहीत. मुद्दा येथे असा आहे कीं, हे जग कोणाच्या मानण्यानुसार चालते ते आपल्याला विचारात घ्यावयाचे असते. जर तुमच्या मानण्यानुसार हे जग चालत असते म्हणजे तुम्हीच देव असतां तर तुमच्या मानण्या न मानण्याचा विचार करणे उचीत ठरले असते पण हे जग तुमच्या मानण्या न मानण्यानुसार चालत नसल्याने तुम्ही काय मानता अथवा मानत नाही ह्याला बिलकूत महत्व रहात नाही. म्हणून कोण माणूस काय मानतो अथवा नाही मानत ह्याचा विचार करण्याला किंमत खरे हिंदू देत नाहीत. हिंदू माणसें निसर्गाला अथवा निसर्गरुपी ईश्र्वराला काय मंजूर आहे त्याचा अंदाज घेणे उचीत समजतात. ह्यासाठी, कोण (माणूस) काय मानतो अथवा नाही मानत ह्याची चर्चा शहाणे हिंदू करीत नाहीत. गेल्या अनेक पिढ्यांच्या एकत्रित अनुभवानुसार जे ज्ञानानुभव हिंदूंच्या परंपरांत स्वीकारले गेले आहे, तेंच आपण मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारत असतो. त्यानुसार पुनर्जन्म माणसाचा होतो हे हिंदू स्वीकारतात. आधुनिक विज्ञानाने जीव ही देहाची रासायनिक चेतना (chemical intelligence) आहे हे जनुकद्रव्य डिएने (DNA) वरील संशोधनाने सिद्ध केले आहे. ह्यावरून हिंदू विचार किती शास्त्रशुद्ध प्रमाणांवर आधारीत आहे हे स्पष्ट होते. इतर धर्माप्रमाणे हिंदू, केवळ कल्पनारम्य गोष्टींत रहात नाही हे समजून घ्यावे लागेल.
शेवटी एक गोष्ट सर्व हिंदूंनी समजून घेतली पाहिजे ती अशी किं, आपण जे जन्मलो आहोत ते आपल्यातील ईश्र्वराला म्हणजे आत्मारामाला, ओळखण्यासाठी आहे, देहाचे भोग घेण्यात रमण्यासाठी (वेळ फुकट घालवण्यासाठी) नाही. जर ही जाणीव ओळखून हिंदू आपले जीवन जगतील तर त्या हिंदूचे कल्याण होईल. खरा हिंदू तो, जो ही जाणीव ठेवून सावधपणे आपले जीवन व्यतीत करतो.
५४. पुनर्जन्मावरून लिंगदेहाचे प्रयोजन काय ते समजते, ते थोडे पहाणे योग्य वाटते, ते असें, आपल्या आयुष्यात आपण षड्रिपुंच्या (काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर) आहारी जाऊन बर्याच चांगल्या वाईट गोष्टी करीत असतो. त्यांचा लेखाजोखा म्हणजे लिंगदेह. माणूस जो जन्मतो तो हा लेखाजोखा, नशीब रुपांने बरोबर घेऊनच. प्रत्येक माणसाचे पूर्वजन्माचे हिशोब त्याच्या कर्मानुसार भिन्न असणार, त्याप्रमाणे त्यांचे नशीबसुद्धा वेगवेगळे असणार. म्हणून प्रत्येक माणसाचे आयुष्य वेगवेगळे असते. कोणी श्रीमंत जन्मतो तर कोणी गरीब, कोणी सुंदर असतो तर कोणी कुरुप असतो. सगळी माणसे कधीच एकसारखी नसतात, दोन माणसे कधीच एकसारखी दिसतसुद्धा नाहीत ह्याचे कारण, त्यांचे लिंगदेह वेगवेगळे असतात. इतर प्राण्यांच्या बाबत तसें नसते. ते सर्व सारखेच दिसतात. कारण त्यांच्यात फक्त देह व जीव असतात, आत्मा व त्याबरोबर लिंगदेह तेथे नसतात. त्यांना पुनर्जन्म नसतो. फक्त माणसाच्या बाबत हा कर्माचा लेखाजोखा (लिंगदेह) आत्म्याला चिकटून असण्याचे कारण, निसर्गात कर्मविपाकाचा सिद्धांत कार्यरत आहे असे मानतात. कर्मविपाकाच्या नियमानुसार, माणसाच्या प्रत्येक कृतीची समसमान प्रतिक्रिया तिच्या तीव्रतेनुसार उत्पन्न होणे क्रमप्राप्त असते. चांगल्या कामाची चांगली व वाईट कामाची वाईट प्रतिक्रिया उत्पन्न होणे स्वाभाविक असते. गेल्या जन्मातील कर्मांच्या प्रतिक्रिया ह्या जन्मात उमटत असतात. हे असें त्याच जन्मात उमटणे ताबडतोब शक्य नसते कारण, त्यासाठी बरेच हिशोब शक्तिसातत्याच्या नियमांनुसार व्हावे लागतात. त्यामुळे ती प्रतिक्रिया पुढच्या जन्मीच उमटणे शक्य होते. ते शक्य होण्यासाठी हा लेखाजोखा आत्म्याबरोबर येणे जरुरीचे असते. तसेंच त्यासाठी आत्म्याला पुनः जन्म घेणे सुद्धा बंधनकारक ठरते. जो माणूस आपल्या जीवनात कांहीं चांगले अथवा वाईट काम करतो त्याचा परिणाम स्वरूप त्याच्या लिंगदेहातील नोंदणींमध्ये बदल होऊन त्याप्रमाणे दुरुस्त्या होत असतात. शेवटी मरतांना जे अंतिम रुप लिंगदेहाचे असते ते घेऊन तो आत्मा तो देह सोडून बाहेर पडतो. म्हणजे एकाद्या माणसाचा लिंगदेह तो जन्मला तेव्हां जसा होता तसा तो मरतांना नसतो. अशारितीने आत्म्याचा लिंगदेह सतत उत्क्रांत होत असतो. आधुनिक विज्ञानाप्रमाणे माणसाचा डिएनेसुद्धा अशाच प्रकारे बदलत असतो व माणसाचा डिएने तो जन्मला तेव्हां जसा होता तसा मरतांना नसतो. कदाचित् असे असेल किं, ह्या डिएनेमध्ये लिंगदेहाची सुद्धा नोंद होत असावी. ह्यावरून हिंदू शास्त्रे विज्ञानानुसार जास्त योग्य ठरतात. असें इतर धर्मांबाबत आढळत नाही. आपला आत्ताचा जन्म गेल्या जन्माच्या कर्मविपाकाप्रमाणे असतो त्यात फेरबदल करता येत नाही. म्हणजे आपण आपले नशीब बदलू शकत नाही. गेल्या जन्मी केलेल्या पापकर्मामुळे जर अंधत्व ह्या जन्मी प्राप्त झाले असेल तर त्यात कोणताही बदल आपणहून स्वतः आपण करू शकत नाही. परंतु, दैविक शक्तींच्या मदतीने ते कदाचित् शक्य असते. शाक्तांच्या शिकवणूकीत हे सांगितले आहे. आत्म्याला लिंग नसते परंतु, ह्या लिंगदेहामुळे तो जन्मतो तो त्याच्या लिंगदेहाचे लिंग घेऊन येतो. म्हणून ह्याला लिंगदेह असे म्हणतात. जेव्हां आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो तेव्हां हा लिंगदेह, कर्मविपाकाचा हिशोब शक्तिसातत्याच्या नियमानुसार संपुष्टात आल्यामुळे नाहीसा झालेला असतो. हिशोबाच्या भाषेत बोलावयाचे तर असें म्हणता येईल किं, कर्मविपाकाची निव्वळ बाकी शुन्य झाल्याने तो आत्मा मोक्षपदाला जातो. गौतम बुद्धानेसुद्धा हा कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य केलेला आहे. एवढी माहिती पुनर्जन्माचे प्रयोजन समजण्यासाठी पुरेशी आहे असें मला वाटते, त्यापेक्षा जास्त माहितीसाठी वाचकांनी शाक्तांतील तंत्रविद्येचा सविस्तर अभ्यास करावा. ह्या माहिती वरून हिंदू आपला पुढचा जन्म कसा असावा ते ठरवू शकतो. संपूर्ण जीवन पापविरहीत जगल्यांने अतिशय चांगला पुनर्जन्म आपण मिळवू शकतो असे हिंदूंच्या शिकवणूकीत दिले आहे. उत्तर आयुष्यासाठी, म्हातारपणासाठी, जसें आपण बचत करतो तसेंच कांहींसे हे आहे. कर्मविपाकाची परतफेड शक्तिसातत्याच्या सिद्धांतानुसार (जेवढ्यास तेवढी) होत असते व म्हणून जगात कधीही अन्याय होत नाही सर्व हिशोबाने होत असते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – १०१ -११०
खोट्या शपथेवर जे कांहीं दुष्कृत्य घडले त्या सर्वाची पूर्ण माहिती जी तुला आहे, जे दिसले व जे ऐकलेस ते सांगून टाक. १०१
जे ब्राह्मण गुरं पाळतात, जे ब्राह्मण व्यापर करतात, जे कारागीरी करतात, जे अभिनयाचे काम करतात, जे गातांत, जे नोकर्या करतात, जे सावकारी करतात, अशा सर्व ब्राह्मणांना शुद्र ठरवून त्याप्रमाणे त्यांची साक्ष घ्यावयाची असते. १०२
टीपः आजचे सर्वच ब्राह्मण जातीचे लोक ह्या नियमांनुसार शुद्र ठरतात.
जर एकादा माणूस हिताचा मुद्दा लक्षात घेऊन चांगल्या उद्देशाने खोटे बोलेल तर तो देवांसाठी तसे बोलतो आहे असें समजावे कारम त्याला पाप लागत नाही. त्याचा स्वर्ग त्याला मिळेल. १०३
टीपः सत्यापेक्षा हित जास्त श्रेष्ठ समजले आहे.
खरे बोलण्यामुळे जर कोण्या निरपराध शुद्राचा वैश्याचा क्षत्रियाचा अथवा ब्राह्मणाचा मृत्यू ओढवणार असेल तर त्यापेक्षा हितकारक खोटे बरे असते. म्हणून त्याप्रमाणे साक्ष देण्यास परवानगी आहे. १०४
अशारितीने हिपासाठी खोटी साक्ष देणार्याने नंतर सरस्वती देवीच्या नांवाने एक पिंड (कारू) अर्पण करावा व त्याचे प्रायश्र्चित्त करावे. अशारितीने तो सरस्वती देवीची क्षमा मागतो. असे केल्याने त्या खोटे बोलण्याचे त्याला पाप लागत नाही. १०५
पवित्र नियमानुसार, असा साक्षीदार साजूक तुपाचे अर्ध्य पवित्र अग्नीला वाहिल, कुशमांड वाचेल, ऋचा ज्या वरूणाला लिहील्या आहेत त्यांचे वाचन करील (त्यात लिहीले आहे, अहो वरूण देवा, तुझ्या बंधनातून माझी मुक्तता कर). अथवा पाण्याला वाहिलेली कडवी गाईल. म्हणजे तो त्या पापातून मुक्त होईल. १०६
जो माणूस आजारी असल्याचे सोंग घेऊन साक्ष देण्यास येण्याचे टाळतो व जर तो तीन पंधरवड्यात साक्ष देण्यास आला नाही तर तो गुन्ह्यात सामील आहे असा अर्थ करून त्यालासुद्धा कर्जाची परतफेड करावी लागेल अथवा कर्जाचा दहावा भाग एवढा दंड राजाच्या खजिन्यात भरावा लागेल. १०७
साक्षीदाराने साक्ष दिल्याच्या आठवड्यात तो आजारी झाला अथवा त्याच्या गराला आग लागली, अथवा त्याचा मृत्यू झाला तर त्याने खोटी साक्ष दिली असें धरून त्याला कर्जाची परतफेड करावी लागेल. १०८
दोघांतील वादांत कोणी साक्षीदार नसेल व त्यात खरा कोण व खोटा कोण ते समजणे अशक्य झाले तर अशा परिस्थितीत शपथेवर बोलण्यास सांगून खरे काय ते ओळखावे. १०९
थोर ऋषीमुनीसुद्धा शपथेवर खरे खोटे शोधत होते, वसिष्ठ ऋषीनी पिग्वनाचा मुलगा राजा सुदासापुढे अशीच शपथ घेऊन त्यांचे शंका समाधान केले होते. ११०

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा