शनिवार, २० जून, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा- ७


मागुन पुढे चालू -
नंतर येणार्या युगात (त्रेता, द्वापार कलि) सात्विकता कमी होत जाते मानव अधिकाधिक दुर्गुणी होत जाईल. अन्याय, खोटेपणा, फसवणूक अशा गोष्टी वाढत जातील. त्याप्रमाणे धर्माचा एक एक पाय कमी होत जाईल. ८२
कृतयुगात मानव रोगविरहीत असतो. त्याचे आयुष्य ४०० वर्षे असेल. त्यानंतर येणार्या युगात ते कमी होत जाईल. ८३
प्रत्येक युगाच्या प्रवृत्तिनुसार त्या त्या युगात मर्त्य लोकांचे जीवन, त्याने करावयाची दानं, त्यांची कर्तव्ये, विविध दैवतांचे परिणाम, हे सर्व असेल. ८४
कृतयुगात माणसासाठी एक कर्तव्य असते तर त्रेतायुगात ते वेगळे असेल. असे होत राहिल. ती कर्तव्ये त्या त्या युगानुसार भिन्न असतील. ८५
कृतयुगात वैराग्य हे कर्तव्य असेल, त्रेतायुगात ज्ञान संपादन करणे, द्वापार युगात त्यागाचे कर्तव्य असेल, कलियुगात दान असेल. ८६
सामान्य माणसे म्हणजे शुद्रांसाठी ही कर्तव्ये सांगितलेली आहेत. परंतु, ब्रह्माच्या मुखातून, हातातून, मांडीतून पायातून उत्पन्न झाले त्यांची कर्तव्ये वेगळी असतील. ८७
ब्राह्मणांसाठी जे ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न झाले ते वेदांचे अध्यन संरक्षण करतील, भिक्षुकी करून उपजिविका करणे, स्वार्थासाठी त्याग करणे अशी कर्तव्ये असतील. ८८
क्षत्रिय जे हातातून उत्पन्न झाले ते समाजाचे संरक्षण वेदाचे अध्यन करतील, स्वताच्या वासनांवर काबू ठेवतील. ८९
वैश्य जे मांडीतून आले ते पशुपालन, वेदांचा अभ्यास करणे, व्यापार, समाजाचे अर्थकारण सांभाळणे अशी कर्तव्ये करतील. ९०


 
मनुस्मृती पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा