बुधवार, १९ जुलै, २०१७

हिंदू कोण – ३०

. हिंदूंतील पाप - पुण्य विचार
मागील भागातून पुढे
अशारितीने श्री भगवान कृष्ण, दैवी व आसुरी संपदा म्हणजे प्रवृत्ती कशा असतात ते सांगतात. सुरुवातीच्या भागात पुण्यकर्मी कसे वागतात ते दिले आहे व नंतरच्या भागात पापी लोक कसे वागतात ते दिले आहे. पापकारक हिंसेबद्दलची अधिक माहिती पुढे आहाराच्या भागात आलेली आहे ती पहावी. येथे श्रीकृष्णानी शास्त्राभ्यास करण्यास सांगितले आहे. हा शास्त्राभ्यास आहे पाप-पूण्य विचाराचा व त्याबद्दल आपण येथे थोडक्यात माहिती पाहिली आहे.

४५. निसर्गाच्या नियमानुसार न वागणे हेसुद्धा पाप समजले जाते हे एक आणखीन पापाचे कारण आहे. अनैसर्गिक लैंगिक संबंध पापकारक असतात. समलिंगी व्यवहार दोन पुरुषांतील असेल तर तो पापकारक असतो, परंतु, दोन स्त्रीयांतील असेल तर तो पापकारक ठरत नाही. सर्व प्रकारची व्यसने, मानसिक आणि दैहिक पापकारक असतात. ह्या व्यसनाबद्दलची चर्चा पुढे आली आहे. मदभाव (superiority complex) आणि मत्सरभाव (inferiority complex) व त्यामुळे जे कृत्य केले जाते ते पापकारक असू शकते. म्हणजे, स्वताला अति उच्च अथवा अतिनीच समजणे पापकारक असते. अशी कांहीं पापाबद्दलची कारणे दिली आहेत. ती सर्व टाळणे म्हणजे पुण्यमय जीवन असें समजता येईल. त्याशिवाय, मनुस्मृतीत तिचे पवित्र नियम न पाळणे हे ब्राह्मणांसाठी पापकृत्य आहे असें सांगितलेले आहे. कारण, सनातनी म्हणजे मनुस्मृतीतील पवित्र नियमांचे पालन करणारा असा अर्थ आहे. अर्थात् हे ब्राह्मणेतर हिंदूंना लागू नाही. पुण्य कशात असते ते शेवटी सामोपचाराच्या भागात दिले आहे. थोडक्यात सांगावयाच तर चांगुलपणाच्या सर्व गोष्टी पुण्यकारक असतात.
क्रमशः पुढे चालू
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू -४०
ज्या राज्यात शुद्र न्यायालय चालवतात राजा बघत बसतो ते राज्य, गांय जशी चिखलात फसते, तसें फसून जाते. २१
ज्या राज्यात शुद्रांची संख्या जास्त आहे, आस्तिक ब्राह्मणांचा अभाव आहे ते राष्ट्र भूकबळी रोंगांने नष्ट होते. २२
न्यायासनावर बसल्यावर ती वस्त्रं घातलेला आणि पालक दैवतांची प्रार्थना केलेला असा न्यायाधीश एक चित्ताने खटल्याचे कामकाज पाहिल. २३
योग्य अयोग्य जाणून तसेंच न्याय्य अन्याय्य ह्यांचें तारतम्य सांभाळून तो अशिलाची बाजू त्याच्या वर्णाच्या क्रमांनेएकून घेईल. २४
न्यायाधीश, बाह्य लक्षणांवरून माणसाच्या मनातील उद्देश समजून जसें त्याचा आवाज, त्याचं वर्ण (जात), त्याचे रुप, हावभाव, त्याच्या नजरेची चळवळ, शरीराची हालचाल, बोलण्याची पद्धत, उभे रहाण्याची ढब ह्यांवरून अंदाज करील. २५-२६
राजा द्विजाच्या लहान मुलांच्या मालमत्तेचे हक्क संरक्षित करील जो पर्यंत गुरुकुलांतून तो बाहेर पडत नाही, अथवा वयांत येत नाही. २७
त्याच प्रमाणे, अविवाहीत, निपुत्रिक, दिवंगत पतिच्या प्रामाणिक विधवा, जिचे कोणीही नातेवाईक नाहीत आणि रोगजर्जर महिला ह्यांच्या हक्काचे संरक्षणसुद्धा राजा करील. २८
न्यायी राजा स्त्रीच्या मालमत्तेचे अपहरण करणार्याला चोर ठरवून त्या प्रमाणे शिक्षा करील. २९
जर एकाद्या जमिनीचा मालक गैरहजर असेल तर राजा ती जमीन तीन वर्षे सुरक्षित ठेवील जर तो तीन वर्षात आला तर ती जमीन त्याला देईल पण त्या सुमारास आला नाही तर ताब्यात घेऊन वापरेल अथवा कोणाला देईल. ३०
जर एकादा माणूस म्हणाला किं, ही वस्तु माझी आहे तर त्याची चौकशी करावी त्याने त्याची सविस्तर माहिती दिली तर तो खरा मालक आहे असें समजून ती वस्तु त्याला द्यावी. ३१
परंतु, जर त्याला त्या वस्तुचे वर्णन करतां आले नाही जसें रंग, आकार, हरवली ती जागा, इत्यादी, तर त्याला त्या वस्तुची किंमत, एवढा दंड त्याला मारून मग ती वस्तु द्यावी. ३२
राजा प्रामाणिक माणसांचा मान राखण्यासाठी ज्याला ती वस्तु मिळाली त्याला त्या वस्तुच्या किंमतीच्या बारावा, दहावा, अथवा सहावा भाग बक्षिस म्हणून देईल. ३३ टीपः ही रक्कम वस्तुच्या मालकाकडून वसुल केली जाईल.
जर वस्तु राजाच्या सेवकास मिळाली तर ती वस्तु राजाच्या खास अधिकार्याच्या निगराणीत सुरक्षित प्रकारे ठेवली जाईल. परंतु, जर त्या सेवकांने ती वस्तु स्वताकडे ठेवली तर त्या सेवकाला चोर ठरवून त्या आरोपाखाली शिक्षा होईल. त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले जाईल. ३४
जर एकाद्याने शपथेवर सांगितले किं, ही वस्तु माझी आहे तर राजा त्याला त्या वस्तुच्या किंमतीच्या सहावा भाग अथवा बारावा भाग एवढा दंड मारून शकतो त्यानंतर ती त्याला दिली जाईल. ३५ टीपः ह्याचा अर्थ आपली वस्तु हरवणे हासुद्धा दंडपात्र गुन्हा आहे असें मनुस्मृती मानते.
जर मालकी बाबत खोटा दावा केला तर त्याच्या मालमत्तेच्या आठवा हिस्सा एवढा दंड त्याला भरावा लागेल. ३६
जर ज्ञानी ब्राह्मणास एकादी वस्तु मिळाली तर तो ती राजाच्या खजिन्यात देऊ शकतो. अथवा स्वतः ठेवू शकतो. कारण, सर्वकांही ब्राह्मणाचेच असते! ३७
जेव्हां राजाला गुप्त खजिना मिळतो तेव्हां तो त्यातील अर्धा भाग ब्राह्मणाला देतो उरलेला भाग स्वताच्या खजिन्यात जमा करतो. ३८
राज्याचे संरक्षण करीत असतांना जर राजाला मातीत कांहीं प्राचीन संपत्ती मिळाली (सोने वगैरे) तर त्यातील अर्धा भाग तो त्याच्या खजिन्यात जमा करील उरलेला ब्राह्मणांना देईल. राजा सर्व राज्यातील मातीचा धनी असतो. ३९
चोरांने पळवलेली मालमत्ता राजांने त्या गोष्टीच्या मालकांस (तो कोणत्याही जातीचा असो) द्यावी जर ती राजांने स्वतःकडे ठेवली तर राजा चोरीचा दोषी ठरतो. ४०

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा