गुरुवार, ९ मार्च, २०१७

हिंदू कोण – १७

क्रमशः चालू
२७. विज्ञानाच्या निकसातून निसर्गाला म्हणजे देवाला पाहिले तर फक्त खरी हिंदू विचारसरणी शास्त्रशुद्ध असल्याचे आढळून येते इतर धर्म निरर्थक ठरतात. कारण इतर धर्मांत देव कोणीतरी व्यक्ती असावी वर कोठेतरी आकाशात रहाणारी, प्रेम करणारी, दयाळु, कृपाळु, क्षमाशिल, भक्तांच्या सर्व चुकांना माफ करणारी अशी आहे असें सांगितले जाते, तसें कांहींही नसल्याचे आढळून येते. त्यामुळे ते पुरोहितांनी पसरवलेले धर्म (ख्रिस्ती, ईस्लाम ब्राह्मण धर्म हे तीनही त्यात येतात.) माणसाची फसवणूक करतात असे नाइलाजांने मान्य करावे लागते. त्यात हिंदूंतील ब्राह्मणांचा हिंदूधर्म सुद्धा आला. मी येथे "खरी हिंदू विचारसरणी", असें लिहीले आहे त्याचा अर्थ, ब्राह्मण विचारांने प्रभावित झालेला हिंदू, असें समजावे. ब्राह्मण विचारात फक्त वैदिक परंपरांचा संदर्भ असतो कारण, इतर हिंदू परंपरांचा ते तिरस्कार करतात.

२८. आतापर्यंत आपण देवांचा विचार केला आहे. देव ही चांगली शक्ती समजली जाते, त्याशिवाय धर्मांत बर्याच वाईट शक्तींचासुद्धा उल्लेख असतो. त्यात इतर धर्मांत सैतान म्हणजेच दानव, राक्षस, हा एक महत्वाचा समजला जातो. त्याचा विचार जर आपण केला नाही तर विषय अपुरा राहतो. अदृष्य निसर्गातील दैत्य, दानव, राक्षस हे वाईट शक्तिची रुपे आहेत असें समजले जाते. देव, यक्ष, गंधर्व, नागदेवता, राक्षस, सूपर्ण आणि किन्नर हे माणसास मदत करणारे असे समजतात. ह्यांत राक्षस दोनही जागी आहे हे विषेश आहे. कारण, राक्षस कधी यक्ष बनतो असे समजले जाते.

पुढील पोस्ट मध्ये "हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती" बद्दलची माहिती पहावयाची आहे.
क्रमशः चालू -

मनुस्मृती सातवा भाग सुरू २१ ४०
कावळे पिंड खाऊन फस्त करतील, यज्ञातील जेवण कुत्री चाखतील, कोणी वरचा कोणी खालचा ह्याचे नियम रहाणार नाहीत, आणि निकृष्ट उत्कृष्टची जागा घेऊन सर्वत्र अराजक पसरेल. २१
शिक्षेच्या मदतीने सर्व राज्य सुरक्षित होते असें करण्याचे कारण पूर्ण निर्दोष असा इसम विरळा असतो. बाकी सर्व मर्यादा ओलांडण्यासाठी उत्सुक असतात. ते होऊ नये म्हणून शिक्षा उपयोगाची असते.
माणूसच नव्हे तर देव, दानव, गंधर्व, राक्षस, पक्षी देवता, नाग देवता असें सर्व शिक्षेला भिऊनच नीट वागतात. २३
शिक्षेचा दुरुपयोग अथवा निरुपयोग झाला तर समाजातील विविध व्यवस्था (वर्ण व्यवस्था, कर्तव्य व्यवस्थआ इत्यादी) नष्ट होतील. २४
शिक्षेचे लाल डोळे अपराध्याला घाबरवतात दोषापासून दूर ठेवतात. परंतु, ते तेव्हांच शक्य होते जेव्हा शिक्षा देणारा स्वतः निर्दोष असतो. २५
राजा सत्यवादी, शिस्तबद्ध, गुणी, निर्दोष आहे, जो शिक्षा देण्या आधी पूर्ण विचार करतो, जो धन, पुण्य आनंद ह्यांना समजतो तो चांगल्या प्रकारे शिक्षा देऊ शकतो. २६
जो राजा योग्यरित्या शिक्षा देतो तो समृद्ध होतो, त्याला तीन आनंद मिळतात. जो अन्यायाने (वासनेच्या आहारी जाऊन, पक्षपात करून, फसवून, पैसे घेऊन) शिक्षा देतो तो न्याय व्यवस्थेला काळिमा फासतो अखेरीस नष्ट होतो. २७
शिक्षा तीक्ष्ण असते ती जर अयोग्य व्यक्तिच्या हाती गेली तर बिघडते. शेवटी ती त्या नालायक राजाला घेरते तो आणि त्याचे साथीदार तिच्या जाळ्यात अडकून नष्ट होतात. २८
तेवढ्याने ती थांबत नाही ती त्याचा राजवाडा, कोठी, त्याच्या राज्याच्या सीमा अशा सर्वांना बाधते. अखेरीस दैवते, ऋषीमुनी जे त्याला सहायाय करीत असतात ते सुद्धा परलोकांत परततात. २९
शिक्षेची अंमलबजावणी यशस्वीरित्या होण्यासाठी एकटा राजा पुरेसा नसतो, तिची अंमलबजावणी मूर्ख, लोभी, पोरकट आणि वासनांध माणूस योग्यप्रकारे करू शकत नाही. ३०
राजा प्रामाणिक, पवित्र नियमांचे पालन करणारा, ज्याच्याकडे चांगले आणि शहाणे सेवक आहेत तोच राजा शिक्षेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करू शकतो. ३१
प्रजेशी जो न्यायाने वागेल, शत्रुला धडा शिकवेल, मित्राशी दुटप्पी वागणार नाही आणि ब्राह्मणांना आदराने वागवेत. ३२
अशारितीने वागणारा राजा जरी लहान असला तरी त्याची ख्याती सर्वदूर पसरेल. जसें तेलाचा थेंब पाण्यावर पसरतो. ३३
जो राजा असें वागत नाही त्याची कुप्रसिद्धी होते. त्याची ख्याती कमी होते. जसें साजुक तुपाचा थेंब पाण्यात. ३४
राजाची निर्मिती केली आहे ते चतुर्वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शुद्र) पद्धतीचे संरक्षण करण्यासाठी. जेथे ही व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत आहे ते राज्य संमृद्ध होते. ३५
आपल्या सेवकांच्या मदतीने तो प्रजेची सेवा, संरक्षण कसे करील त्याची माहिती मी यथावकाश सांगणार आहे. ३६
राजा सकाळी लवकर उठेल त्यानंतर वेद, वेदांत (उपनिषद), अरण्य आणि राजकारण अशा शास्त्रांत पारंगत असलेल्या ब्राह्मणांची पुजा करील. त्यांचा सल्ला घेऊन काम करील. ३७
तो राजा पवित्र, वृद्ध आणि ज्ञानी ब्राह्मणांचा आदर करील. असें क्ल्याने राक्षस प्रसन्न होतात. ३८
राजा जरी विनम्र असला तरी त्यांने नेहमी अधिक विनम्र ब्राह्मणांच्या संगतीत रहावे. असा राजा कधीही विनाश पावत नाही. ३९
विनम्रतेचा त्याग केल्यामुळे कित्येक राजे विनाश पावले आहेत. विनम्रतेने एकादा जोगीसुद्धा राजपदाला पोहोचतो. ४०

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा