मागल्या
भागाकडून पुढे चालू
विरागने
तीव्र तपस्येच्या
मदतीने हे
जग उत्पन्न
केले,
हे
तुम्ही सर्व
ऋषी जाणून
घ्याल तर
ते बरे
होईल.
३३
त्यानंतर
मी अति
अवघड तपस्या
करून दहा
ऋषी उत्पन्न
केले.
ज्याना
मी ह्या
जगाचा कारभार
पहाण्यास नेमले.
३४
त्यांची
नांवे अशी,
मरिची,
अत्री,
अंगिरस,
पुलस्य,
पुलह,
क्रातु,
प्रकेतस,
वशिष्ठ,
भृगु
आणि नारद.
३५
ह्या
दहा ऋषींनी
नंतर सात
मनु,
तेजस्वी
व सामर्थ्यवान
दैवते आणि
ऋषी उत्पन्न
केले,
त्यांचे
सामर्थ्य
अमर्याद होते.
३६
त्या
बरोबर यक्ष,
गंधर्व,
राक्षस,
पिशाच्च,
अप्सरा,
असूर,
नागदेवता,
सूपर्ण
व असंख्य
पितर (आदिदैवते)
उत्पन्न
झाली.
३७
अशा
सर्वांच्या
प्रभावातून
नैसर्गिक प्रपात
जसे,
विजेचा
कडकडाट,
ढगांचा
गडगडाट,
अस्पष्ट
व स्पष्ट
दिसणारे
इंद्रधनुष्य,
अशनि,
अद्भूत
आवाज,
अनेक
प्रकारचे दैवी
आवाज व
प्रकाश अशा
विविध गोष्टी
तयार होऊ
लागल्या.
३८
घोड्याचे
तोंड असलेले
किन्नर,
विविध
प्रकारची माकडे,
मासे,
मांसाहारी
व शाकाहारी
पक्षी,
पशु,
विविध
प्रकारची माणसे,
त्यानंतर
उत्पन्न झाली.
३९
लहान
मोठे किडे,
किटक,
डांस,
इत्यादी
सुक्ष्म जीव
तयार झाले.
अशारितीने
सर्व सजीव
सृष्टी उत्पन्न
झाली.
४०
विरागने
उत्पन्न केलेल्या
ऋषी,
मुनी,
तपस्वी
ह्यांच्या
मदतीने तयार
झालेल्या ह्या
सृष्टीचा कारभार
पहाण्यास मी
(मनु)
माझ्या
मर्जीनुसार
सुरुवात केली.
४१
सृष्टीत
निर्माण होणार्या
विविध प्राण्यांच्या
उत्पत्तिची
तर्हा मी
निश्चित केली.
ती
अशी,
४२
प्रथम
शाकाहारी व
मांसाहारी
प्राणी उत्पन्न
झाले.
त्यानंतर
राक्षस,
पिशाच्च
व माणसे
गर्भातून
निपजली.
४३
अंड्यातून
उपजणारे मांसे,
पक्षी,
सरपटणारे,
कासव
इत्यादी उत्पन्न
केली.
४४
उष्ण
व दमट
परिस्थितीत
उपजणारे बारीक
किटक उपजू
लागले.
४५
त्यानंतर
बीजांतून
उपजणारी वनस्पती
तयार झाली.
४६
ज्या,
फुलाशिवाय
फळे देतात
त्यांना वनस्पती
असें म्हणतात.
ज्या,
फुलाशिवाय
फळे देतात
त्यांना वनस्पती
असें म्हणतात
आणि ज्या
फुलाने फळे
देतात त्यांना
वृक्ष असे
समजतात.
अनेक
फांद्या व
मुळं असलेली
गवतें,
वेल,
ही
छाटण्यांतून
उत्पन्न होणारी
त्यात आली.
४७-४८
अशा
सर्व एकाच
जागी रहाणार्या
जीवांना म्हणजे
वनस्पतींना,
जगण्यासाठी
अंधाराची गरज
असते,
त्यांना
त्यातून आनंद,
दुःख,
कळा,
वेदना,
प्रेम
इत्यादी भावना
सुप्तपणे होत
असतात.
४९
जन्म-मरणाच्या
परिचक्रात
पहिला ब्राह्मण
असतो व
शेवटी झाडे
असतात.
५०
अशारीतीने
सृष्टी उत्पन्न
केल्यावर तो
विश्वकर्मा
स्वतामध्ये
विरून जातो.
एका
युगातून दुसरे
युग त्यामुळे
उत्पन्न होत
असते.
५१
मनुस्मृतीत
मनुला विशेष
महत्व दिलेले
असले तरी
त्याची निर्मिती
स्वयंभू आहे
असे सुद्धा
सांगितले आहे.
येथे
स्वयंभू म्हणजे
स्वत:च्या
विचारांतून
निर्माण झालेला
असा होतो.
स्वयंभू
हा शब्द
परमेश्वर अशा
अर्थाने वापरलेला
आहे.
मनुस्मृतीत
जीवसृष्टीच्या
निर्मितीचा
क्रम जो
दिला आहे
तो आधुनिक
ज्ञानात मान्य
असलेल्या
क्रमापेक्षा
वेगळा आहे.
आधुनिक
ज्ञानात मान्य
असलेल्या क्रमात
सुरुवातीला
सुक्ष्म जीव
व त्यातून
मोठे जीव
अशी निर्मिती
होते असे
दिले आहे.
त्या
उलट मनुस्मृतीत
सुरुवातीस
मोठे व
नंतर सुक्ष्म
असा क्रम
दिला आहे.
प्राण्यांची
निर्मिती आधी
दाखवली आहे
व त्यांच्या
खाद्याची
त्यानंतर झाली
असे दाखवले
आहे.
वस्तुतः
सुरुवातीला
खाद्य व
नंतर खाणारा
अशी उत्पत्ती
दाखवली पाहिजे
तसे नाही
म्हणजे,
मनुस्मृतीत
तर्कशुद्धता
नसल्याचे
स्पष्टपणे
दिसून येते.
पुढील
पोस्ट मध्ये चालू
माझा
इमेल
ashokkothare@gmail.com
ह्या
इमेल
वर
तुम्ही
संपर्क
करु
शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा