ह्या
ब्लॉगमध्ये
मी दोन
विषयांवर
लिहीण्याचे
ठरवले आहे.
पहिला
मनुस्मृतीची
चर्चा करावयाची
आणि त्यानंतर
इतर चालु विषयांवर
लिहीणार आहे.
मनुस्मृती इ.पूर्व १५०० वर्षे लिहीला गेला असावा असे वाटते.
मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्थेला फार महत्व असल्याचे दिसून येते.
विषेश म्हणजे ही वर्ण व्यवस्था जन्मावर अवलंबून आहे.
त्या उलट महाभारतात आणि त्या आधीच्या काळात ही गुणकर्मावर अवलंबून असल्याचे दिसून येते.
ह्याचा अर्थ, मनुस्मृती सनातन धर्माचा भाग नाही हे स्पष्ट होते.
कारण, सनातन धर्मात वर्ण व्यवस्था गुणकर्मावर अवलंबून होती.
म्हणजे मनुस्मृती त्या नंतरच्या काळातील म्हणजे ब्राह्मण काळातील आहे.
म्हणून हे पुस्तक ब्राह्मण धर्माचे आहे असे समजावे लागेल.
मनुस्मृती वाचताना त्याचा सतत अनुभव येतो.
पुढील पोस्ट पासून मी मनुस्मृती वाचण्यास सुरुवात करणार आहे.
मनुस्मृतीमध्ये
बारा अध्याय आहेत.
त्यातील माहिती
नुसार स्त्री,
शुद्र आणि ब्राह्मण
ह्यांचे संबंध समाजात कसे
असावेत ते दिसून येते.
इतर वर्णांना
फारसे महत्व नाही.
त्यातील श्लोकांवर भाष्य करणार आहे म्हणजे हल्लीच्या काळाच्या संदर्भात त्यांचा अर्थ समजणे सोपे होईल.
मला आशा आहे ह्याचा उपयोग माझ्या वाचकांना होईल.
आता आपण दहा दिवसानंतर भेटू या.
जर कोणा वाचकास मनुस्मृतीचे मराठी भाषांतर हवे असेल तर त्याने खाली दिलेल्या इमेल वर विनंती पाठवावी.
ashokkothare@gmail.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा