सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

हिंदू कोण – ६०

मागील भागातून पुढे –
१५. सत्त्व, रजस् व तमस् गुणांची माहिती –

७१. जेव्हां प्रापंचिक हिंदू माणसाला आत्मशुद्धिची साधना करण्याची इच्छा होते तेव्हां, त्याला ज्या गोष्टी माहीत असणे आवश्यक असतें त्या आता समजून घेऊया. प्रथम त्याला त्याची अध्यात्मिक अवस्था काय आहे ते समजणे जरुरीचे असते. अशा तीन अवस्था मान्य आहेत, त्या तामसी, राजस व सात्त्विक अशा असतात. त्यांना गीतेत त्रिगुण असें सांगितले आहे. त्यांची माहिती थोडक्यात पहावयाची आहे. तामसी माणसे कशी असतात तें प्रथम पाहिले पाहिजे. तम म्हणजे अंधार, तामसी म्हणजे अंधकारमय. ह्याठिकाणी अध्यात्मिक जागृतीचा अंधार असा अर्थ घ्यावयाचा आहे. जो माणूस आत्मशुद्धिच्या जागृती पासून दूर आहे व त्यामुळे अध्यात्मिक शुद्धीच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींत (पापमय) तो रमतो अशा माणसास तामसी माणूस असें समजले जाते. कदाचित् असा माणूस जगाच्या दृष्टीने सुशिक्षित, विद्वान, असू शकतो. परंतु, असा इसम आत्मशुद्धीच्या दृष्टीने जागृत नसल्यास तो हिंदू मान्यतेनुसार तामसीच समजला पाहिजे. त्या उलट, एकादा इसम जगाच्या दृष्टीने अडाणी, अशिक्षित असला तरी अध्यात्मिक दृष्टीने जागृत असेल तर तो तामसी समजला जात नाही. एकादा खूप शिकलेला वकिल, इंजिनीयर, डॉक्टर, वैज्ञानिक असा कोणीही माणूस अध्यात्मिक दृष्ट्या जागृत नसल्यास हिंदू मान्यतेनुसार तामसी समजला पाहिजे. अध्यात्मिक जागृतीच्या अभावामुळे तो आपल्यातील षड्रिपूंच्या बाबत सावध नसतो. म्हणजे एकापरीने अध्यात्मिक जागृती व षड्रिपूंच्या बाबतची सावधानता ह्या एकच असतात. अशी सावधानता नसल्यानें तो षड्रिपूंच्या प्रभावाखाली रहातो. पाश्र्चात्य जीवन पद्धती ह्या दृष्टीने पहाता, तामसी ठरते. त्यांची जीवन रहाणी कितीही रुबाबदार, देखणी व म्हणून आकर्षक असली तरी ती अध्यात्मिक शुद्धीच्या दृष्टीने अयोग्य ठरते. तामसी लोकांची साधारण लक्षणे कोणती असतात ते पहावे लागेल. तामसी माणूस वासनामय जीवनात जास्त रमतो.
तामसी माणसे व्यसनाधीन रहाण्यात धन्यता मानतात. तसेंच त्यांना त्यांच्या व्यसनाधीनतेचे कौतुक असते. मी हे मानत नाही, ते मानत नाही, अशा वल्गना करून अध्यात्मिक गोष्टींची निर्भत्सना करण्यात धन्यता मानतात. त्यांना मर्यादा तत्त्वाचे महत्व नसते. वासनामय जीवन जगणे हेंच जीवन असा त्यांचा ठाम विश्र्वास असतो. लैंगिक स्वैराचार हा जीवनाचा मुख्य गाभा आहे असें ते मानतात. समलिंगी संभोग घेण्याचा कल असतो. सर्व प्रकारच्या लैंगिक विकृतीचे तो समर्थन करतो. तामसी लोक आत्मा वगैरे मानत नाहीत व त्या अनुषंगाने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी ते हसण्यावर नेतात. असे लोक वास्तविक प्रगती भरपूर करूनही नेहमी असंतुष्ट व म्हणून आतल्या आत दुःखी असतात. असे दुख विसरण्यासाठी ते अधिकाधिक व्यसनाधीन होत जाऊन अखेरीस बरबाद होतात. कारण ते त्यांचा आत्मा विसरलेले असतात. वैज्ञानिक वास्तविक प्रगती म्हणजेंच प्रगती असा गैरसमज त्यांच्यात दिसतो व ते अध्यात्म सोडून वैज्ञानिक गोष्टींत अडकून घेतात. जनावराप्रमाणे ते आपले लैंगिक व्यवहार उघड्यावर करण्यात हुशारी समजतात. त्यांच्यात काम, क्रोध, मद व मत्सर विशेष तीव्र असतात व त्यानुसार ते त्यांचावर अवलंबून असणार्यांचा अपमान करून व्यवहार करण्यात धन्यता मानतात. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, आसुरीसंपदा मध्ये दिलेली बरीच लक्षणे त्याच्यात कमी जास्त प्रमाणांत आढळून येतात. शमन प्रवृत्ती म्हणजे लज्जा अथवा मर्यादा, त्यांच्यात कमी असते कारण ते आत्म्याचे लक्षण असते. शोधन प्रवृत्ती म्हणजे भोगीपणा त्यांच्यात जास्त असतो. अशा दोषांमुळे तामसी लोक अध्यात्मिक विकास करण्याचा विचारसुद्धा करीत नाहीत. ते पापमय जीवन जगत रहातात.
तामसीपणा सर्वच माणसांत सारखाच नसतो. तो निरनिराळ्या माणसांत निरनिराळ्या अवस्थेत असतो. तामसी माणसे ईश्र्वराची किंवा एकाद्या देवतेची पुजा करतांना दिसतात. त्यांच्या सर्व पुजा आराधना सकाम असतात म्हणजे त्यांना मोक्ष नको असतो. त्या शिवाय देवभक्तीचा देखावा करून सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा सुद्धा उद्देश असू शकतो. पुजा करून जर फायदा झाला तर देवावर विश्र्वास ठेवू नाहीतर नाही अशी भाषा असते. तामसी माणसे आप्त मित्रांसाठी चांगली असतात. इतरांशी मतलबाने चांगली असतात. तरीसुद्धा जर कांहीं कारणांनी त्यांना असा अनुभव आला कीं, आपल्यात आत्मा म्हणून कांहीं आहे तर ते त्याचा पाठपुरावा करून त्याची प्रचिती घेण्याचा प्रयास करतात व जेव्हां त्यांना त्याची प्रचिती येते तेव्हां, तो तामसी माणूस तमो अवस्थेतून रजो अवस्थाकडे जाऊ लागतो. त्याच्यातील आसुरीसंपदेचा प्रभाव कमी होऊ लागतो.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ३२१ -३३०
त्याच प्रकारची शारिरीक शिक्षा त्या चोराला होईल जो शंभर (पलास) वस्तू चोरेल. जे वजनाने आहे आणि त्या गोष्टी कांहींही असू शकतात. जसें सोने, चांदी, तांबे, इत्यादी तसेंच महागडे वस्त्र, सुद्धा त्यात येते. ३२१
पन्नास पलास वजनाची चोरी करणार्याचे हात छाटून टाकावेत. दुसर्या प्रकारच्या वस्तूंसाठी त्याच्या किमतीच्या अकरापड दंड करावा. ३२२
खानदानी माणसाचे, विशेष करून स्त्रीचे अपहरण करण्याबद्दल तसेंच जडजवाहर चोरणार्याला देहदंड करावा. ३२३
मोठी जनावरं, शस्त्रास्त्रं, औषधी वनस्पती, ह्यांच्या चोरीबद्दल राजा काय शिक्षा द्यावयाची ते ती चोरी कां झाली ते समजून त्यानुसार तसेंच त्या गोष्टी कोठे नेल्या जात होत्या त्या पर्माणे शिक्षा ठरेल. ३२४
ब्राह्मणाची गाय चोरणे, भाकड गायीला वेसण घालण्यासाठी नाकांत भोक पाडणे, तिची चोरी करणे, असें गुन्हे करणार्याला त्याचा एक पाय छाटला जाईल. ३२५
दोर, कापूस, मद्य बनवण्यासाठा लागणार्या चीजा, शेण, काकवी, ताक, दही, दूध, पाणी आणि गवत ३२६
बांबूची अथवा वेताची भांडी, वेगवेगळ्या प्रकारची लवणं (मिठ, क्षार), मातीची भांडी, राख,३२७
सांसे, पक्षी, तेलं, साजूक तुप, लोणी, मांस, वगैरे पदार्थ जे प्राणीजन्य आहेत, ३२८
अशा चिजांची चोरी करण्याबद्दल त्या वस्तूंच्या किंतीच्या दुप्पट दंड आकारला जाईल. ३२९
फुलं, फळं, हिरव्या पालेभाज्या, झुडपं, वेल, मोठी झाडं, अशा वनस्पतीच्या चोरी बद्दल पांच क्रिष्नाल इतका दंड आकारला जाईल. ३३०

क्रमशः चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा