सोमवार, १२ जून, २०१७

हिंदू कोण – २६

मागील पोस्टवरूनपुढे चालू –
३९. आता आपल्याला खरोखर काय अशुद्ध असू शकते ते पहावे लागेल. प्रत्येक माणसाच्या मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, शरीरात आतड्यात मळ असतो. असे समजतात किं, तो निदान दोनशे ग्राम असतो. तसेंच निदान शंभर मि.ली. मुत्र असते. माणूस कितीही शुचिर्भुत बाहेरून झाला तरी तो त्याच्या शरीरातील ही अशुद्ध द्रव्ये कधीच काढू शकत नाही. म्हणजे तत्वतः कोणतीही व्यक्ति अंतर्यामी खर्या अर्थाने शरीराने शुद्ध असू शकत नाही. केवळ पितांबर वा असे कोणतेही पवित्र वस्त्र नेसल्याने कोणी शुद्ध ठरत नाही. थोडक्यात एवढेच म्हणता येईल किं, एकवीसाव्या शतकात अशा प्रकारच्या शुद्ध अशुद्धतेच्या कालबाह्य विचारांना उत्तेजन देणे बंद केले पाहिजे. उत्क्रांत होणार्या हिंदू परंपरांत अशा मागांसलेपणाला उत्तेजन देता येणार नाही. उपलब्ध ज्ञानानुसार आपण सर्व नेहमीच अशुद्ध असतो तसेंच रहाणार. शुद्धतेच्या गप्पा मारणारा तुमचा पुरोहित सुद्धा सदैव अशुद्धतच असतो! अशा शुद्धतेच्या गोष्टी करणार्यांनी हे लक्षात घ्यावयास पाहिजे किं, ते देवाची पुजा करण्यास बसतात ते हा सर्व मळ मुत्र पोटात असतांना बसतात! पुरुष पुरोहिताबाबत आणखीन कांहीं दोष दिसतात त्याबद्दल नंतर पहावयाचे आहे.
४०. दुसर्या अशुद्धतेच्या गोष्टी आहेत, सुयेर सुतक बाबतच्या. सुयेर हे घरात बाळ जन्मले की पाळतात. सुतक घरातील इसम मृत झाला तर पाळतात. ह्या दोनही प्रसंगी अशुद्धता पाळण्याचे कारण काय? त्यावर निदान मला तरी कोठेही पटण्यासारखे कारण आढळलेले नाही. बाळाला जन्म देण्यामुळे ती स्त्री अशुद्ध कशी होते? बाळंतीणीला बाळाबरोबर रहाणे आवश्यक असतें पण तेवढ्यासाठी तिला अशुद्ध ठरवणे कोणत्या तर्कांत बसतें? कोणी मेला म्हणून घरातील माणसे अशुद्ध कशी होतात? अशा प्रश्र्नांना ब्राह्मणांकडे स्पष्टीकरण नाही. अशुद्धतेच्या ह्या कल्पना अतिरंजित स्वरुपाच्या आहेत. हिंदूंनी मासिकपाळी, सुयेर सुतक ही अशुद्धतेची कारणे निखालस चुकीची असल्यामुळे पाळणे बंद करावीत. मनुस्मृतीत कोठेही ह्या सुयेर सुतकचा उल्लेख नाही. म्हणजे ह्या दोन गोष्टी पवित्र नियमांचा भाग नाहीत. विशेष असें किं, श्राद्ध विधीवर मात्र बरेच पवित्र नियम दिलेले आहेत. मग सुयेर सुतक बद्दल असें कांहीं नियम कां नाहीत? ह्याचा अर्थ, हे दोन रिवाज नंतर कोणीतरी तयार केले आहेत. जीवदानी देवीची पुजा करतांना ह्या अशुद्धता पाळण्याचे संकेत आहेत ते इतर सर्व देवांसाठी लागू केले पाहिजेत. बाळ जन्मले म्हणून त्याकाळात उलट, मुद्दाम देवींची (सटवी, संतोषीमाता, लेकुरवाळी वगैरे) पुजा करून त्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यात त्या बाळाची आई सामील झाली पाहिजे. तसेंच घरातील माणूस देवाघरी गेले म्हणून त्या काळात मुद्दाम पितरांचे श्रांद्ध करावयावे त्यांना मृतात्म्यास शांति देण्याची प्रार्थना करावयांस पाहिजे. मृतात्म्यास मदत व्हावी म्हणून त्याकाळात कुलदैवताची सुद्धा पुजा घरच्या देवघरात नित्य करावयांस पाहिजे. दुर्दैवाने केवळ अज्ञानामुळे आज ते होत नाही.

क्रमशः पुढील पोस्टमध्ये चालू राहील –
मनुस्मृती सातवा भाग सुरू १९१ २१०
तो त्याच्या सैन्याच्या विविध व्युहरचना करून लढाई खेळेल. त्यांत एकेकटे लढणारे असतील, संघटीतपणे लढणारे असतील, सुईसारखी रचना असेल, पसरून चहोबाजूने हल्ला करतील असें अनेक प्रकार असतील.१९१
सपाट रणक्षेत्रात तो रथातून वा घोड्यावरून लढेल. पाण्याच्या क्षेत्रात होडीतून व हत्तीवरून लढेल, वनश्रीने भरलेल्या रणभूमीवर तो धनुष्यबाण, भाले, तलवारी वगैरे अस्त्रे वापरून लढेल. १९२
कुरुक्षेत्रातील, मत्स्य देशातील, पंकल, आणि सुरसेना येथील व इतरही लोक जे उंच व हलके आहेत ते पुढून चढाई करतील. १९३
त्याने सैन्याची जमवाजमव केल्यानंतर तो त्यातील माणसांचे नीट बारकाईने निरीक्षण करील. त्यानंतर त्यांना भाषण देऊन युद्धाची आवश्यकता समजावून देईल. त्यांचा जोर आणि नैतिक बळ वाढवण्याचा तो प्रयत्न करील. १९४
एकदा कां त्याने शत्रूला त्याच्याच नगरात अडकवले किं, तो त्याच्या प्रजेला हैराण करण्याचे सत्र अजमावेल. त्यामध्ये त्यांची खाद्याची रसद, पाणी, खाणे, गवत त्यांना मिळणार नाही असें करेल. १९५
तो चढाई करणारा राजा शत्रुपक्षाचा पाण्याचा साठा करणार्या टाक्या मोडून टाकील. तटबंदी व खड्डे नष्ट करील. ज्यांच्या आधाराने शत्रू प्रतिहल्ला करण्याची शक्यता असते. तसेंच रात्रीसुद्धा चढाई चालूच ठेवील. १९६
राजा त्याच्या हेरांच्या मदतीने शत्रूपक्षातील फूटू शकणारे हेरून त्यांना फोडण्याचे प्रयत्न चालू ठेवतील. त्याचे गुप्तचर शत्रूपक्षाच्या सर्व हालचालींची इत्तंभूत माहिती राजाला देत रहातील. त्यानंतर, शुभ काळ पाहून तो अंतिम विजयासाठी जिंकण्याची लढाई सुरू करील. १९७
हे सर्व जरी करणे राजाला शक्य असले (दंड कारवाई) तरी शक्यतर तो साम (गोड बोलून), दाम (पैसे चारून), किंवा भेद (तोडफोडीचे तंत्र वापरून) निती वापरणे चालू ठेवावे. कारण, ह्या तीन कमी हानिकारक व जीवहानि टाळणारे म्हणजे अहिंसक आहेत. १९८
ह्याचे कारण जेव्हां दोन राजपुत्र एकमेकांशी लढतात तेव्हां जीत कोणाची होईल ते सांगता येणारे नसते. म्हणून नेहमी युद्धाचा मार्ग शेवटचा असावा. १९९
हे तीन (साम, दाम व भेद) तो वापरीत असतांना दुसर्या बाजूस तो चढाईचीसुद्धा तयारी तितक्याच उत्साहात करीत असला पाहिजे. २००
एकदा तो लढाईत जिंकला किं, मग तो प्रथम त्याच्या आराध्य देवाचे आभार मानील. त्यानंतर ब्राह्मणांची पुजा करून त्यांचे आशिर्वाद घेईल. त्यानंतर तो माफीचे आदेश देईल. त्यानंतर तो जिंकलेल्या प्रदेशातील जनतेला अभय दान करून आपलेसे करील. २०१
जिंकलेल्या प्रदेशातील प्रजेची मनोभावनेचा आदर करण्यासाठी हरलेल्या राजाचाच एक जवळचा नातेवाईक आपला मांडलिक म्हणून बसवेल. त्याच्या कडून आपल्या अटी मान्य करून घेईल. २०२
जिंणारा राजा जिंकलेल्या राज्याचे नियम व अटी निश्र्चित करील आणि त्यानंतर नेमलेल्या मांडलिक राजाचा व त्याच्या आमात्यांचा यथोचित सत्कार करील. २०३
जप्त केलेली मालमत्ता जी उपयुक्त आहे तिची विल्हेवाट (वाटणी करण्यात) लावण्यात आनंद आहे तर तसें करावे. हे योग्य वेळ पाहून करावे. २०४
ह्या जगांत जे कांहीं माणसांच्या जीवनांत होत असते ते दोन गोष्टींवर विसंबून असते. त्यातील एक आहे नशीब व दुसरे आहे माणसाचे कर्तुत्व. नशीब अगम आहे त्याचा मार्ग समजणे दुरापास्त असते तर कर्तुत्व माणसाच्या हातातील असते म्हणून कोणतेही नियोजन करतांना आपल्या कर्तुत्वाचाच अंदाज घेऊन नियोजन करावे. २०५
जर जिंकलेला राजा आपल्या विवेकाने, मिळणार्या लुटीवर (सोने, स्त्रीया, मित्र, जमीन इत्यादी) खूष असेल तर, हरलेल्या राजाशी शांततेचा करार करून परत फिरेल. २०६
पाठून हल्ला करण्याची शक्यता असलेला शेजारी राजा व त्याचे मित्र ह्यांची व्यवस्था केल्यावरच जिंकणार्या राजांने आपल्या यशाची फळं चाखण्याचा मानस ठेवावा. त्यात हरलेल्या राजाला मित्रत्वाच्या नात्यांने (मोठेपणा घेऊन) सामील करून घ्यावे. जरी तो मनांत शत्रुत्व धरून असल्याचे माहित असले तरी. २०७
राजाची खरी ताकद त्याच्याकडे किती सोने व मुलूख आहे त्यावर जितकी अवलंबून असते त्यापेक्षा जास्त असते, त्यांचे किती सच्चे मित्र राजे व मित्र राज्ये आहेत. कारम, तो मित्र राजा आज जरी कमजोर असला तरी तो उद्या कधी बलाढ्य होईल ते सांगता येत नाही. २०८
कमजोर राजा किर्तिमान होतो जेव्हां त्याची प्रजा संतुष्ट असते. तो त्याच्या प्रजेच्या क्षेमकुशलतेसाठी सतत प्रयत्नशिल असेल. कारण, अशा राजाला इतर राजेसुद्धा त्याच्या ह्या गुणवत्तेमुळे मानतात. २०९
शहाणा राजा त्या सर्वांना आपला प्रतिस्पर्धी मानतो जे शहाणे, उच्च कुलीन, शूर, चतूर आहेत, स्वतंत्र बुद्धीने काम करतात, रुबाबदार आहेत आणि आपल्या मताशी प्रामाणिक आहेत. २१०
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -

पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील

मंगळवार, ३० मे, २०१७

हिंदू कोण – २५

मागील पोस्ट वरून चालू -
. हिंदूंतील शुद्धते बाबतच्या कल्पना
३८. शुद्धता दोन प्रकारच्या आहेत, एक देहाची दुसरी मनाची. देवाची पुजा करतांना देहाची शुद्धता बाळगण्याची आवश्यकता विशेष महत्वाची समजली जाते. सामान्य शुद्धता केवळ हात, पाय तोंड धुवून साध्या होते परंतु, अभ्यंग स्नान देहाची पूर्ण शुद्धता करते. ह्यात ब्राह्मणांच्या शुद्धतेच्या कल्पना विशेष काटेकोर किंवा फाजिल असतात. मनाची शुद्धता बहुधा गृहीत धरूनच वागतात. इतर हिंदूंत साधारण देहाची बाहेरून शुद्धता असली किं, ते त्यांना पुरेसे असते. स्त्रीच्या शुद्धतेचा बराच बागुलबोवा ब्राह्मणांत केला जातो. स्त्रीस मासिकपाळी असते त्या काळात तिने देवांना स्पर्श करू नये असें संकेत आहेत. त्याबद्दल थोडे पाहावे लागेल. एवढ्याने पुरुषवर्गाचे समाधान झाले नाही म्हणून किं काय विधवेला कायम अपवित्र ठरवण्या इतपत ब्राह्मणांची मजल गेली. जर विधूर अपवित्र होत नाही तर विधवा कशी अपवित्र ठरते? उत्क्रांत हिंदूनी विधवेला अपवित्र मानू नये. विधवेने देवांची स्वताच्या हातांनी पुजा करावी कारण त्यात कांहींही गैर नाही. तसेंच सर्व धार्मिक विधींत सहभाग करावा. लोकांनी तिला त्यात उत्तेजन द्यावे.
हल्ली, स्त्रीने तिच्या मासिकपाळीच्या काळात देवाची पुजा करावी का नाही ह्या प्रश्र्नावर बरीच चर्चा होत आहे. त्यांत तिने पुजा करू नये असे आग्रहाने बोलणारे आहेत इतर कांहीं त्यावर कारणमिमांसा पहाण्याचा आग्रह धरतात. त्याशिवाय सुयेर सुतक असें आणखीन दोन प्रकार शुद्धतेच्या दृष्टीने विचारात घ्यावे लागतील. मासिकपाळीच्या काळात स्त्री अशुद्ध असते असे ब्राह्मण धर्मातील लोक समजतात. म्हणून तिने देवांची पुजा करू नये असे सांगितले जाते. मनुस्मृतीत मात्र ह्यांवर कांहींही मार्गदर्शन केलेले नाही. दुसरे कारण असें सांगतात किं, त्या काळात तिला विश्रांतीची सक्त गरज असतें म्हणून तिने पुजा इतर गृहकृत्यात भाग घ्यावयाचा नसतो. विश्रांतीचे जर कारण असेल तर त्यासाठी धर्मांत नियम करण्याची काय गरज? म्हणजे, हे दुसरे कारण स्त्रीला अशा गोष्टींपासून दूर ठेवण्याचे असू शकत नाही. निदान धर्मशास्त्रात तरी विश्रांतीसाठी स्त्रीस अशुद्ध ठरवणे कसे योग्य असेल ते पटत नाही. तिला विश्रांतीची गरज असते असें कारण सांगणे शक्य असतांना अशुद्धतेचा खोटा हेत्वारोप करण्याचे काय कारण? ह्याचा अर्थ, स्त्रीस पुजाविधी करण्यास विरोध करण्यामागील उद्देश ती अशुद्ध असते हे ठरवणे हांच असू शकतो. मासिकपाळीच्या काळात ती अशुद्ध कशी ठरते ते पहावे लागेल. ह्या सर्व गोष्टी फार प्राचीन (अज्ञान) काळात ठरवल्या गेल्या होत्या, आज विज्ञान काळात त्या घेऊन बसणे कितपत शहाणपणाचे होईल हा प्रश्र्न आहे. मासिकपाळीत जे द्रव्य स्त्रीच्या शरीरातून स्त्रवते ते खरोखरच अशुद्ध द्रव्य असतें का? तत्त्वतः ते द्रव्य अतिशय शुद्ध स्वरुपाचे असते. जर त्या काळात गर्भधारणा झाली असती तर त्या द्रव्यातून एक नवीन जीव पोसला गेला असता, असें द्रव्य अशुद्ध कसे असेल? उद्या माणसाचे रक्त अशुद्ध आहे असे जर म्हंटले तर ते कितपत मान्य केले जाईल? बर्याच लोकांना माहीत नसेल पण हे सत्य आहे किं, कोंबडीचे अंडे हे त्या कोंबडीची पाळी असते. कोणत्याही प्राण्याचे असे द्रव्य अशुद्ध कसे असेल? कोंबडीचे अंडे एक उत्तम अन्न असते. म्हणजे स्त्रीचा मासिकपाळीचा काळ अशुद्धतेचा निश्र्चित नसतो. केवळ स्त्रीस अपमानीत, जलील करणे, तिचा अभिमान दुखवणे एवढाच पुरुषी उद्देश असावा असे वाटते. ह्या मागे पुरुषाचा अहंकार हेंच कारण असू शकते. पुरुषी समाज व्यवस्थेचा हा परिणाम आहे असें म्हणावे लागेल. सनातनी (म्हणजे मागांसलेल्या) ब्राह्मणांत अजूनही हा स्त्रीचा अवमान करणे चालूच आहे. हे सनातनी म्हणजे मागांसलेले ब्राह्मण स्वतः हे करतात इतर हिंदूंनासुद्धा तसे करण्याचा आग्रह करीत असतात. एकवीसाव्या शतकातील उत्क्रांत होणार्या हिंदूंने ते मान्य करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ऋतुच्या काळात खर्या हिंदू बायकांनी देवाची पुजा स्वताच्या हाताने करण्यास हरकत नसावी. उत्क्रांत होणारा हिंदू धर्म म्हणजे जो सनातन, मागासलेला नाही असा हिंदू धर्म असे समजावे.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती सातवा भाग सुरू १७१ १९०
जेव्हां तो पहातो कीं, त्याचे सैन्य पूर्ण तयारीत आहे, तोव्हां तो शेजारील राष्ट्रावर स्वारी करील. १७१
जेव्हां त्याची बाजू नाजूक असते तेव्हां तो शेजारशी मित्रत्वाचे धोरण स्वीकारेल आणि शांतता पाळेल १७२
जेव्हां तो पहातो प्रतिस्पर्धी सर्व प्रकारे बलाढ्य आहे तेव्हां तो त्याचे सैन्य दुभागून काम करतो. १७३
परंतु, जर त्याने हेरले कीं, प्रतिस्पर्धी सहजपणे आपल्यावर स्वारी करून येऊ शकतो तर तो त्वरीतपणे दुसर्या मित्र राजाच्या मदतीची हाक मारतो. १७४
जो राजपुत्र आपल्या प्रजेतील घातकी लोक व शत्रू ह्यांना दाबून टाकतो त्याची गुरूची करावी तशी पुजा करावी. १७५
एवढे करूनही जर वाईट लोकांच्या कारवाया चालूच राहील्या तर त्यांने त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारावे. १७६
चार युक्त्या वापरून शहाणा राजा सर्व मित्र, शेजारी, तटस्थ अशा सर्वांपेक्षा वरचढ रहाण्याचा प्रयत्न करील. १७७
तो राजा सर्व परिस्थितींचा मग त्या ताज्या असतील अथवा जुन्या वा भविष्यातील होणार्या असतील, त्यांच्या चांगल्या व वाईट बाजूंचा नेमका अंदाज घेईल. १७८
जो राजा आपल्या चुका समजून त्या सुधारण्याचे धोरण अवलंबून त्वरित काम करतो तो कधीही दुसर्या राजाकडून हरत नाही. १७९
राजकीय चातुर्याचे गमक अशात असतें किं, तो असा काम करील किं, कोणत्याही दोस्तास, तटस्थास, आणि शत्रूस अशी संधी देणार नाही कीं, ते त्याला धोका करू शकतील. १८०
जेव्बां राजा एकाद्या आगाऊ शत्रूवर स्वारी करतो तेव्हां तो सावधपणे त्याच्या राजधानीवर चाल करतो. त्यासाठी कोणती पावले त्यांनी उचलावीत ते पहा. १८१
राजा त्याच्या सैन्याच्या परिस्थितीनुसार मार्गशिर्षात अथवा फाल्गून महिन्यात वा चैत्रात स्वारी करील. १८२
एरवीसुद्धा तो स्वारी करूं शकतो जर शत्रूची परिस्थिती त्यावेळी बिघडलेली असेल. म्हणजे त्याप्रमाणे त्याला विजयाची खात्री असेल. १८३
स्वताचे राज्य सुस्थितीत असेल अशी खात्री करून स्वारीची सर्व तयारी करून आणि हेरांचे जाळे त्या राज्यात पसरवून मग तो स्वारीस निघेल. १८४
तिन तर्हेने रस्ते मोकळे करून सर्व सैन्याची सहा दले सज्ज करून तो राजा निवांतपणे स्वारीला निघेल. १८५
गुप्तपणे शत्रूला मिळालेला मित्र व सोडून गेलेले सैनिक जे पुन्हा सामील होण्यासाठी येतात त्यांच्या पासून सर्वात जास्त धोका संभवतो हे त्या राजांने लक्षात ठेवले पाहिजे. १८६
तो त्याच्या सैन्याची व्युह रचना करून तसा निघेल. त्यांत दंडासारखी, पाचरीसारखी, हिर्यासारखी, मकर रचना (ह्यात दोन त्रिकोण त्यांचे टोक जोडल्या अवस्थेत असते) सरळ रचना, गरूड रचना अशा बर्याच रचना ज्या युद्ध शास्त्रात दिल्या आहेत त्या वापराव्यात. १८७
ज्या दिशेने हल्ला होईल असें वाटते त्या धिशेला तो कूच करील. त्यांने मात्र सैन्याच्या आतल्या कमळ रचनेत संरक्षित रहावयाचे असते. १८८
तो त्याच्या सैन्यातील अधिकार्यांना त्यांच्या हाताखालील अधिकार्याला, ठिकठिकाणी नेमून तो स्वतः जेथे सर्वात जास्त धोका संभवतो तेथे राहील. १८९
तो त्यांच्या निष्ठावंत योद्ध्याच्या तुकड्या सर्व बाजूस पसरून सज्ज ठेविल, ते हल्ला करण्यास तसेंच हल्ला झेलण्यास पटाईत असतील. १९०

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.